शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘त्या’ वाहिनीवरील मीटरची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:39 IST

इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला याचा शोध घेतला जाणार आहे.

नाशिक : इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला याचा शोध घेतला जाणार आहे. गेल्या गुरुवारी (दि.१७) इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकात विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना महावितरणचा कर्मचारी समीर वाघ यास विद्युत शॉक लागून तो खांबावरच अत्यवस्थ स्थितीत लटकला होता. कर्मचाºयांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत असताना महापालिकेच्या पथदीपांचा वीजप्रवाह खंडित करण्यासाठी डीपीतील फ्यूज काढण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच वाहिनीमध्ये वीजप्रवाह आला आणि वाघ यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वीजप्रवाह नेमका कसा सुरू झाला, याबाबतची चौकशी महावितरणने सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या वाहिनीवरील पथदीपांसाठी असलेले मीटर तपासणीसाठी चेन्नई येथील ‘सॅन्डस’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या मीटरचे पृथक्करण करून प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार महापालिकेच्या याच वाहिनीवरून वीजप्रवाह अचानक सुरू करण्यात आल्याची नोंद मीटरमध्ये झाली आहे. तसा अहवाल कंपनीने महावितरणला पाठविला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पथदीप डीपीतूनच वीजप्रवाह सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र नेमका वीजप्रवाह कुणी सुरू केला, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. वाघ याच्या मृत्यूप्रकरणी महावितरणने यापूर्वीच महापालिकेचय विद्युत विभागाकडे बोट दाखविले आहे तर पालिकेने त्या दिवशी शासकीय सुटी असल्याने कर्मचारी कामावरच नसल्याने प्रवाह सुरू करण्याचा प्रश्नच नसल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी ज्या ठिकाणाहून वीजप्रवाह सुरू झाला ती मनपाची विद्युतपेटी असल्याने आणि तेथूनच फ्यूज गायब असल्याने या ठिकाणी काहीतरी काम सुरू करण्यासाठी कर्मचारी आले असावेत, असे महावितरणने म्हटले आहे. या ठिंकाणी विजेच्या संदर्भात माहिती असलेली व्यक्तीच येऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून असा प्रकार घडणे अशक्य असल्याचा युक्तिवादही महावितरण खासगीत करीत असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मनपाच्या विद्युत कर्मचाºयांविषयी शंका घेतली आहे. मनपाच्या कर्मचाºयांनी विजेचे काम करताना महावितरणशी संपर्क साधून कुठे काय काम सुरू आहे याची माहिती घेणे अपेक्षित असते मात्र त्यांनी अशी कोणतीही माहिती घेतली नसल्याने परस्पर असे उद्योग कुणी केले याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. याप्रकरणी आता महावितरणच्या प्रशिक्षण विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.