शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

‘त्या’ वाहिनीवरील मीटरची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:39 IST

इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला याचा शोध घेतला जाणार आहे.

नाशिक : इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला याचा शोध घेतला जाणार आहे. गेल्या गुरुवारी (दि.१७) इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकात विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना महावितरणचा कर्मचारी समीर वाघ यास विद्युत शॉक लागून तो खांबावरच अत्यवस्थ स्थितीत लटकला होता. कर्मचाºयांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत असताना महापालिकेच्या पथदीपांचा वीजप्रवाह खंडित करण्यासाठी डीपीतील फ्यूज काढण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच वाहिनीमध्ये वीजप्रवाह आला आणि वाघ यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वीजप्रवाह नेमका कसा सुरू झाला, याबाबतची चौकशी महावितरणने सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या वाहिनीवरील पथदीपांसाठी असलेले मीटर तपासणीसाठी चेन्नई येथील ‘सॅन्डस’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या मीटरचे पृथक्करण करून प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार महापालिकेच्या याच वाहिनीवरून वीजप्रवाह अचानक सुरू करण्यात आल्याची नोंद मीटरमध्ये झाली आहे. तसा अहवाल कंपनीने महावितरणला पाठविला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पथदीप डीपीतूनच वीजप्रवाह सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र नेमका वीजप्रवाह कुणी सुरू केला, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. वाघ याच्या मृत्यूप्रकरणी महावितरणने यापूर्वीच महापालिकेचय विद्युत विभागाकडे बोट दाखविले आहे तर पालिकेने त्या दिवशी शासकीय सुटी असल्याने कर्मचारी कामावरच नसल्याने प्रवाह सुरू करण्याचा प्रश्नच नसल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी ज्या ठिकाणाहून वीजप्रवाह सुरू झाला ती मनपाची विद्युतपेटी असल्याने आणि तेथूनच फ्यूज गायब असल्याने या ठिकाणी काहीतरी काम सुरू करण्यासाठी कर्मचारी आले असावेत, असे महावितरणने म्हटले आहे. या ठिंकाणी विजेच्या संदर्भात माहिती असलेली व्यक्तीच येऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून असा प्रकार घडणे अशक्य असल्याचा युक्तिवादही महावितरण खासगीत करीत असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मनपाच्या विद्युत कर्मचाºयांविषयी शंका घेतली आहे. मनपाच्या कर्मचाºयांनी विजेचे काम करताना महावितरणशी संपर्क साधून कुठे काय काम सुरू आहे याची माहिती घेणे अपेक्षित असते मात्र त्यांनी अशी कोणतीही माहिती घेतली नसल्याने परस्पर असे उद्योग कुणी केले याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. याप्रकरणी आता महावितरणच्या प्रशिक्षण विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.