शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४१ अंशांवर

By admin | Updated: March 30, 2017 22:43 IST

येवला : गेल्या सात दिवसापासून येवल्याच्या तपमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.

पारा ४१ अंशांवर येवला : गेल्या सात दिवसापासून येवल्याच्या तपमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. वाढत्या उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात मोठा उष्मा जाणवू लागला आहे. अंगाची लाही होण्यास सुरुवात झाली आहे. त्यापासून येवलेकरांनी सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहे, लिंबू सरबतापासून ते आईस्क्रीम पार्लरपर्यंतच्या व टरबुजाच्या दुकानांमध्ये धाव घ्यायला सुरुवात केली आहे.मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरणामुळे तपमान कमी झाले होते, परंतु सध्या पहाटे गारवा आणि दुपारी उष्मा अशी परिस्थिती होती. परंतु गेल्या सात ते आठ दिवसांपासून तपमानात चढउतार चालू आहे. उन्हाचा पारा अचानक वाढू लागल्याने येवलेकरांना उन्हाळ्याचा जोरदार तडाखा अनुभवायला मिळत आहे. लग्नाची खरेदी व बस्त्याची गर्दी हा अपवाद वगळला तर वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवू लागल्याने घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाली आहे. मागील वर्षी दुष्काळात मार्चअखेर पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचला होता. यंदा त्या तुलनेत पारा दोन अंशाने कमी आहे. शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने थाटली आहे. गरिबांचा फ्रीज (मातीचा माठ) आता सर्वत्र दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने डोक्याला पांढरे उपरणे बांधून अथवा टोपीचा वापर सुरू झाला आहे. तपमानाच्या चढउतारामुळे दवाखान्यात गर्दी वाढत आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. भरदुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून, प्रत्येकजण सावलीचा शोध घेताना दिसत आहे. सुदैवाने पाण्याची तीव्र टंचाई यंदा नाही. तर दुसरीकडे उन्हाने मात्र नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने, सकाळी 10 वाजल्यापासूनच घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्त्यावर सकाळी 10 वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यत अघोषित संचार बंदी अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे वाढत्याउन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. येवल्यात मंगळवारी पारा 41 अंशावर पोहचला. हे तापमान वाढून 43 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उष्म्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. उन्हात अंगाची लाही लाही होत असताना घसा ओला करण्यासाठी शीतपेयांच्या ठेल्यांकडे धाव घेत आहेत. खाद्यविक्र ेत्यांचाही शीतपेयांच्या विक्र ीकडे अधिक कल असल्याचे दिसत आहे. लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत या आरोग्यवर्धक शीतपेयांपेक्षा उसाच्या रसाला नागरिकांची अधिक पसंती असल्याने रसाच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. याशिवाय मिनरल वॉटर, बाटलीबंद शीतपेये व अन्य पेयांच्या मागणीत 40 टक्क्यÞांनी वाढ झाल्याचे एका विक्र ेत्याने सांगितले. मोसंबी, अननस आदी फळांच्या रसांनाही मोठी मागणी आहे. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.