शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मेनरोड होणार मोकळा

By admin | Updated: July 26, 2014 00:54 IST

फेरीवाला धोरण : अन्यत्र होणार पुनर्वसन; नवीन मार्केट उभारणार

नाशिक : अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांनादेखील अडथळा ठरलेला मेनरोड येत्या वर्षभरात मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे. फेरीवाला धोरणाअंतर्गत येथील विक्रेत्यांना अन्यत्र स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गंगाघाटावरील भाजीबाजारही स्थलांतरित करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.शहरात कुठेही व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा आणि अपघात होत असतात. त्यामुळे पालिका संबंधित अतिक्रमणधारकांवर नेहमी कारवाई करीत असते. फेरीवाले त्यास विरोध करतात आणि पुनर्वसनाची मागणी करतात. फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन करणे बंधनकारक आहे. परंतु आठ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंद असलेल्या रस्त्यावर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला मेनरोडवरील अतिक्रमणे हटविणे बंधनकारक आहे. फेरीवाला धोरणाअंतर्गत अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भद्रकालीसारख्या ठिकाणी हे व्यावसायिक स्थलांतरित केले जाऊ शकतात. भद्रकालीत फळविक्रेते पालिकेच्या जागेत व्यवसाय करतात. परंतु दुसऱ्या लेनमधील अनेक छोटे गाळे बंद अवस्थेत असून, त्याचा अवैध कृत्यांसाठी वापर होतो. त्यामुळे ते टाळण्यासाठी याठिकाणी नवीन मार्केट उभारणीचा पालिकेचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास मेनरोडवरील अनेक व्यावसायिकांना या जागेत स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे. मेनरोड हा विक्रेत्यांनी व्यापला असून, तेथे व्यापारी संकुलात व्यवसाय करणाऱ्यांनादेखील अडचण होते. हा रस्ता असूनही दुचाकी जाण्यासदेखील जागा नसते. तसेच पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. फेरीवाला धोरणाअंतर्गत या विक्रेत्यांचे पुनर्वसन झाल्यास हा त्रास वाचणार आहे. (प्रतिनिधी)