शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जागवल्या सातव यांच्या स्मृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST

नाशिक : हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने नाशिकच्या पदाधिकाऱी आणि युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा ...

नाशिक : हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने नाशिकच्या पदाधिकाऱी आणि युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाशिकशी ऋणानुबंध कायम ठेवलेल्या सातव यांनी २०१६ साली नाशिकला एका कार्यक्रमानिमित्त भेट दिल्याची स्मृतीदेखील पदाधिकाऱ्यांनी जागवली.

काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार करणारे आणि कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या राजीव सातव यांनी कायम पक्षासाठी झोकून देऊन काम केले. अनेकदा त्यांनी विविध उपक्रमांच्या निमित्ताने तसेच पक्षकार्यासाठी नाशिकचे दौरे केले. २०१६ साली नाशिकला आगर टाकळी परिसरात उभारण्यात आलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासदेखील ते उपस्थित होते. प्रत्येक उपक्रमावेळी नाशिकच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याशी संवाद साधून त्यांच्या भावना, पक्षवाढीसाठीच्या उपाययोजना याबाबत चर्चा केल्याची आठवण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

---इन्फो--

नाशिकची सासुरवाडी

रा सातव यांचे श्वशूर वामनराव पैठणकर हे एचएएल कंपनीत अधिकारी होते. त्यामुळे काही काळ ओझर आणि त्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा निवास होता. त्यामुळेच सातव हे नाशिकला त्यांचे दुसरे घर असल्याचे सांगायचे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकला सातव यांचे येणे झाले तर दिवसभर कामे आटोपून सासुरवाडीला जाऊन पुन्हा सायंकाळच्या कार्यक्रमांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत कॉग्रेस कमिटी कार्यालयात उपस्थित राहत असत.

--कोट ---

भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व गमावले

राजीवजी आणि आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आमचे नेते राहुल गांधी यांचे तर ते अत्यंत निकटवर्तीय होते. पक्षाचे भविष्यातील प्रमुख राष्ट्रीय नेतृत्व असल्याचीच आम्हा सर्वांची भावना होती. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याशी जोडले गेलेले त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राबाहेरही प्रस्थापित झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का असून आम्ही भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वच गमावले आहे.

डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री

कार्यकर्ता ते नेता असा माझ्या नजरेसमोरचा प्रवास

मी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या कार्यकारिणीत हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात, उपक्रमात आमचा एकत्रित सहभाग असायचा. माझ्यानंतरचे प्रदेश अध्यक्षपद, राष्ट्रीय युवा अध्यक्षपद या सर्व प्रवासात आम्ही सदैव बरोबर होतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता, सहकारी ते पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व असा त्यांचा प्रवास मी जवळून अनुभवला. त्यांच्या जाण्याने पक्षाची आणि वैयक्तिक स्तरावर माझी अपरिमित हानी झाली आहे.

शरद आहेर, काँग्रेस शहराध्यक्ष

---

कार्यकर्त्यांचा हक्काचा नेता

२००४ साली ते युवा कॉग्रेसचे प्रदेश चिटणीस असतानाही ते नाशिकचे प्रभारी होते. तेव्हापासूनच त्यांच्याशी खऱ्या अर्थाने ऋणानुबंध जुळले होते. त्यावेळीदेखील ते अगदी साधे आणि निगर्वी व्यक्ती होते. पुढे ते युवा प्रदेशाध्यक्ष झाले, खासदार झाले. त्यानंतरही दिल्लीत आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना हक्काचा नेता म्हणून तेच जवळचे वाटायचे. त्यांच्या निधनाने समस्त युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घरातला माणूस गेल्याचे दु:ख झाले आहे.

राहुल दिवे, नगरसेवक

--------------------

कोणताही बडेजाव नसलेलं नेतृत्व

प्रभारी पद असो किंवा प्रदेशाध्यक्ष असो की ते खासदार असोत कधीही त्यांच्या पदाचा त्यांनी बडेजाव केला नाही. कॉग्रेसच्या कार्यक्रमासाठी रेल्वेने आले तरी पदाधिकाऱ्यांना या, स्वागत करा असा कोणताही बडेजाव न करता रिक्षात बसून ते थेट कार्यालयात आल्याचेही अनेकदा घडले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकाऱ्यांशी समानतेने वागणारे नेतृत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नरेश पाटील, काँग्रेस शहर सरचिटणीस

---------