शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘नासाका’ विक्रीला सभासदांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:24 IST

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी ...

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी हातात रुमणे घेऊन करतील, असा इशारा सभासदांनी वार्षिक सभेत दिला.नासाकाची सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी होते. दोन वार्षिक सभेतील विषय एकमताने मंजूर झाल्यानंतर २०१७-१८ चा चालू हंगाम कशाप्रकारे सुरू करायचा याबाबत सभासदांनी विविध सूचना केल्या. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मुदत होत असताना जिल्हा बॅँकेने कारखाना विक्रीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी गत आठ महिन्यांपासून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ करीत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सभासदांपुढे मांडून शासन सातत्याने कारखान्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने व्याजावर व्याज लावत ते वाढविण्यात आल्याने आज कर्ज ८४ कोटींपर्यंत गेले आहे. गेल्या चार वर्षांपासून कारखान्याचा हंगाम बंद आहे व २०१३ मध्येच कारखाना १०० टक्के एनपीएमध्ये गेल्याने ४७ कोटी रुपये अतिरिक्त व्याजाचा भार टाकला आहे. बॅँकेच्या अधिकाºयांना व संचालक मंडळाला कारखाना विक्रीची घाई झाली असून, ही बाब शेतकºयांसाठी दुर्दैवी आहे. बॅँकेने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र शासन दरबारी दाखल असताना व त्या आधारे शासन कर्जाचे पुनर्गठन करून थकहमीसाठी प्रयत्न करीत असताना बॅँकेने दिलेला दाखला रद्द करणे हा षडयंत्राचा भाग आहे. अशाही परिस्थितीत कारखान्याने बॅँकेला थकीत कर्ज भरण्याची हमी दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जिल्हा बॅँकेचे ६ संचालक असताना विक्रीबाबत ठराव होतो, ही बाब योग्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच संतू पा. हुळहुळे, प्रकाश जगझाप, बाळासाहेब म्हस्के, अ‍ॅड. सुभाष हारक, बाबुराव मोजाड, बबनराव कांगणे, माधवराव गंधास, अशोकराव खालकर, भिकाजी शिंदे आदींनी विविध सूचना केल्या. सभेत कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. तसेच आगामी गळीत हंगाम २०१७-१८ सुरू करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.