शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘नासाका’ विक्रीला सभासदांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:24 IST

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी ...

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी हातात रुमणे घेऊन करतील, असा इशारा सभासदांनी वार्षिक सभेत दिला.नासाकाची सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी होते. दोन वार्षिक सभेतील विषय एकमताने मंजूर झाल्यानंतर २०१७-१८ चा चालू हंगाम कशाप्रकारे सुरू करायचा याबाबत सभासदांनी विविध सूचना केल्या. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मुदत होत असताना जिल्हा बॅँकेने कारखाना विक्रीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी गत आठ महिन्यांपासून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ करीत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सभासदांपुढे मांडून शासन सातत्याने कारखान्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने व्याजावर व्याज लावत ते वाढविण्यात आल्याने आज कर्ज ८४ कोटींपर्यंत गेले आहे. गेल्या चार वर्षांपासून कारखान्याचा हंगाम बंद आहे व २०१३ मध्येच कारखाना १०० टक्के एनपीएमध्ये गेल्याने ४७ कोटी रुपये अतिरिक्त व्याजाचा भार टाकला आहे. बॅँकेच्या अधिकाºयांना व संचालक मंडळाला कारखाना विक्रीची घाई झाली असून, ही बाब शेतकºयांसाठी दुर्दैवी आहे. बॅँकेने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र शासन दरबारी दाखल असताना व त्या आधारे शासन कर्जाचे पुनर्गठन करून थकहमीसाठी प्रयत्न करीत असताना बॅँकेने दिलेला दाखला रद्द करणे हा षडयंत्राचा भाग आहे. अशाही परिस्थितीत कारखान्याने बॅँकेला थकीत कर्ज भरण्याची हमी दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जिल्हा बॅँकेचे ६ संचालक असताना विक्रीबाबत ठराव होतो, ही बाब योग्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच संतू पा. हुळहुळे, प्रकाश जगझाप, बाळासाहेब म्हस्के, अ‍ॅड. सुभाष हारक, बाबुराव मोजाड, बबनराव कांगणे, माधवराव गंधास, अशोकराव खालकर, भिकाजी शिंदे आदींनी विविध सूचना केल्या. सभेत कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. तसेच आगामी गळीत हंगाम २०१७-१८ सुरू करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.