शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

ग्रामपंचायत निवडणुकीचा गोंधळ टाळण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:38 IST

नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची असतानाही त्यांच्याकडून ती पार पाडली जात नसल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. अशा प्रकारची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांवर आयोगाने ताशेरेही ओढले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक

नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची असतानाही त्यांच्याकडून ती पार पाडली जात नसल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. अशा प्रकारची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांवर आयोगाने ताशेरेही ओढले आहेत.मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मुदतीत सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे, त्यांची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद पार पाडत नसल्यामुळे जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुदत संपुष्टात येऊनही निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतींचा बेकायदेशीर कारभार चालविल्याच्या घटना घडल्या, परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाला माहिती देण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्या तालुक्यातील महसूल कर्मचारी व अधिकाºयांवर कारवाई करण्यात आली होती. अलीकडेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नायब तहसीलदार व लिपिकाला याच प्रकरणावरून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आले असून, मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची व पर्यायाने गटविकास अधिकाºयाची असल्याचा निवडणूक आयोगाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनादेखील वारंवार निवडणूक आयोगाने फटकारल्यामुळे भविष्यात हा प्रकार टाळण्यासाठी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.