शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक

By admin | Updated: June 2, 2014 01:56 IST

मालेगाव : पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली.

मालेगाव : पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार दादा भुसे होते. बैठकीस पं.स. सभापती वंदना पवार, अनिता अहिरे, अण्णा पवार, पं.स. व तालुक्यातील खते-बियाणे, औषध विक्रेते उपस्थित होते. प्रारंभी तालुका कृषी अधिकारी भास्करराव निकम यांनी कृषी विभागाकडील योजनांचे नियोजनाची माहिती दिली. कृषी अधिकारी अहिरे खरीप हंगामाचे क्षेत्र त्यासाठी लागणारे खते बियाणेंचे नियोजनाची माहिती दिली. भुसे यांनी विक्रेत्यांकडील खते बियाणेंचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी मांडण्याची सूचना केली. बाळासाहेब शिरसाठ यांनी मालेगाव येथे महाबिजचे कार्यालय व कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावा, आर. सी. एफ. खत कंपनीकडून जिल्ह्यास व तालुक्यास युरीरा १५-१५-१५, २०-२०-० ही खते जास्त प्रमाणात दिली जावीत. युरिया खतासोबत विद्राव्य खते घेण्याची सक्ती करु नये. औषधांच्या बाबतीत औषध कंपन्यांकडून मूळ प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे विक्रेत्यांना ही औषधे विक्री करता येत नाही. तालुक्यात प्रमुख विक्रेत्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विक्रेत्यांनाही खते, बियाणे औषधे वेळेवर उपलब्ध होत नाही. जादा भावाने या कृषी निविष्टा द्याव्या लागतात. त्यामुळे शेतकर्‍यांना माल विक्रीस अडचण येते. महाबिजचे एन.५३ कांद्याचे बियाणे अ‍ॅडव्हान्स देऊनही हे बियाणे मिळत नाही. महाबिजचे अधिकारी बियाणे तालुक्यातील विशिष्ट विक्रेत्यालाच दिले जाते व त्यांच्यामार्फत भरमसाठ नफा घेऊन विक्री केली जाते. या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी तक्रार मांडल्या. दुष्काळ व अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे. या परिस्थितीचे भान ठेवून कापूस, मका इत्यादी बियाणे उत्तम दर्जाचे व रास्त भावात द्यावी. त्यांना लागणारा रासायनिक खतांचा तुटवडा पडू देऊ नये, असे आवाहन पं.स. सभापती वंदना पवार यांनी केले. यावेळी आमदार भुसे यांनीही मार्गदर्शन केले.