शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संतोषा, भागडी उत्खननप्रकरणी आज मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST

ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि येथील जैवविविधतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. ...

ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि येथील जैवविविधतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या माध्यमातून संतोषा व भागडी येथील अवैध उत्खननावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मगिरी डोंगरावर अवैध उत्खनन झाल्याची बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी दोषी आढळलेल्या खाणमाफियाला दीड कोटीचा दंड देखील आकारण्यात आला आहे तर संबंधित अधिकाऱ्यास निलंबित देखील करण्यात आले आहे.

ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील बेलगाव ढगा येथील संतोषा व भागडी हे जैवविविधतेने संपन्न असे डोंगर असून पर्यावरणासाठी देखील महत्त्वाचे आहेत. अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी मांडला आहे. खाणमाफियांकडून हे डोंगर पोखरण्याचे काम सुरू असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यात आला आहे. याप्रकरणी वारंवार पर्यावरण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता या प्रकरणी मंगळवारी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात दुपारी १२.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे सात सदस्य तसेच संबंधित गावचे सरपंच तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीत टास्क फोर्सचे कार्य तसेच कारवाई, वनविभागाचा अहवाल याबाबत सविस्तर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.