शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:07 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. दोन दिवसांत संबंधित ग्रामपंचायतीने थकबाकीची रक्कम जमा करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिला आहे. सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, मानोरीचे सरपंच रामदास चकणे, कणकोरीचे सरपंच संपत चकणे, मºहळचे उपसरपंच काशीनाथ कुºहे, सदस्य भारत दराडे आदी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे १२ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला आहे. जलशुद्धीकरण केेंद्र दुरुस्तीवर खर्च करूनही त्यात वीज नसल्याने नागरिकांना थेट धरणातून नळ पाणीपुरवठा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र शोभेची वस्तू बनली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. उशिरा का होईना प्रशासनाला जाग येऊन या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीच्या प्रारंभी उपसरपंच नवनाथ कºहे यांनी पाणीपट्टी वसुली होत नसल्याचा विषय मांडला. मºहळ येथे पाणीपुरवठा नियमित होत नाही. जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जलकुंभात पाच गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी वसुली थकली असल्याचे गाºहाणे त्यांनी मांडले. मुख्य जलवाहिनीला पाण्याच्या टाक्या जोडल्या असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मºहळकर फक्त उन्हाळ्यात योजनेचे पाणी घेतात, उर्वरित आठ महिने स्थानिक विहिरीवरून पाणी मिळवतात. त्यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याचा आरोप सरपंच चकणे यांनी केला.