शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:07 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. दोन दिवसांत संबंधित ग्रामपंचायतीने थकबाकीची रक्कम जमा करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिला आहे. सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, मानोरीचे सरपंच रामदास चकणे, कणकोरीचे सरपंच संपत चकणे, मºहळचे उपसरपंच काशीनाथ कुºहे, सदस्य भारत दराडे आदी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे १२ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला आहे. जलशुद्धीकरण केेंद्र दुरुस्तीवर खर्च करूनही त्यात वीज नसल्याने नागरिकांना थेट धरणातून नळ पाणीपुरवठा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र शोभेची वस्तू बनली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. उशिरा का होईना प्रशासनाला जाग येऊन या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीच्या प्रारंभी उपसरपंच नवनाथ कºहे यांनी पाणीपट्टी वसुली होत नसल्याचा विषय मांडला. मºहळ येथे पाणीपुरवठा नियमित होत नाही. जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जलकुंभात पाच गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी वसुली थकली असल्याचे गाºहाणे त्यांनी मांडले. मुख्य जलवाहिनीला पाण्याच्या टाक्या जोडल्या असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मºहळकर फक्त उन्हाळ्यात योजनेचे पाणी घेतात, उर्वरित आठ महिने स्थानिक विहिरीवरून पाणी मिळवतात. त्यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याचा आरोप सरपंच चकणे यांनी केला.