शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:07 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. दोन दिवसांत संबंधित ग्रामपंचायतीने थकबाकीची रक्कम जमा करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिला आहे. सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, मानोरीचे सरपंच रामदास चकणे, कणकोरीचे सरपंच संपत चकणे, मºहळचे उपसरपंच काशीनाथ कुºहे, सदस्य भारत दराडे आदी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु जलशुद्धीकरण केंद्राचे सुमारे १२ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने गतवर्षी वीजपुरवठा खंडित केला आहे. जलशुद्धीकरण केेंद्र दुरुस्तीवर खर्च करूनही त्यात वीज नसल्याने नागरिकांना थेट धरणातून नळ पाणीपुरवठा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र शोभेची वस्तू बनली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. उशिरा का होईना प्रशासनाला जाग येऊन या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीच्या प्रारंभी उपसरपंच नवनाथ कºहे यांनी पाणीपट्टी वसुली होत नसल्याचा विषय मांडला. मºहळ येथे पाणीपुरवठा नियमित होत नाही. जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जलकुंभात पाच गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी वसुली थकली असल्याचे गाºहाणे त्यांनी मांडले. मुख्य जलवाहिनीला पाण्याच्या टाक्या जोडल्या असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मºहळकर फक्त उन्हाळ्यात योजनेचे पाणी घेतात, उर्वरित आठ महिने स्थानिक विहिरीवरून पाणी मिळवतात. त्यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याचा आरोप सरपंच चकणे यांनी केला.