शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र अत्यावश्यक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

नाशिक : मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र असावे, ...

नाशिक : मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र असावे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे यांनी व्यक्त केले.

वसंत व्याख्यानमालेतील सत्ताविसावे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

मृत्यूबद्दल समाजात एक भीती असून त्याविषयी सामूहिक चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनाचा सुखांत कसा होईल, हा विचार रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे; परंतु कसे मरावे याचे अधिकार घटनेत नसून इच्छामरणाविषयी कायदा नाही. काही देशांत मात्र हा कायदा असल्याचे ॲड. भिडे यांनी स्पष्ट केले. गंभीर आजारात रुग्ण मरणासन्न असल्यास डॉक्टरी प्रयत्न अपुरे पडतात. अशा वेळी मृत्यू हातात नसला तरी कसे जगावे, हे आपण ठरवू शकतो. सक्रिय इच्छामरण भारतात गुन्हा असला तरी जगात याविषयी कायदा असल्याचे ॲड. भिडे यांनी सांगितले.

सक्रिय आणि निष्क्रिय इच्छामरणाविषयी भारतात कायदा नाही. अशा वेळी आपल्या ‘सुखांत जीवनाचा’ या पुस्तकातील संदर्भ देऊन ॲड. अविनाश भिडे यांनी रुग्णास वैद्यकीय इच्छापत्र करण्याची तरतूद असावी, असे विशद केले. गंभीर आजाराच्या रुग्णावर उपचार करताना अशी वेळ येते की, तिथे कुठलीही मात्रा चालत नाही. अशा परिस्थितीत रुग्णाचे वैद्यकीय इच्छापत्र असल्यास डॉक्टरांसह नातेवाइकांनाही निर्णय घेणे सहजसाध्य होईल.

म्हणून प्रत्येकाने मृत्युपत्र बनवितानाच वैद्यकीय इच्छापत्र तयार करणे सोयीचे ठरेल, असेही ॲड. भिडे यांनी सांगितले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते : ॲड. भानुदास शौचे

विषय : नेताजी आणि सावरकर

फोटो

२७ॲड. भिडे