शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

२३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, ...

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, या परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आलेली असतानाही पहिल्याच दिवशी ९१.१ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांना उपस्थिती नोंदविल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या; परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पुनर्नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, २ जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती. परंतु, या परीक्षांसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने १० जूनपासून परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी.एस्सी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. या लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.

इन्फो-

कोरोनामुळे १८ विद्यार्थी परीक्षेला मुकले

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पहिल्या दिवशी राज्यभरातील १६७ परीक्षा केंद्रांवर सकाळच्या सत्रात सुमारे ४ हजार ९९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यातील ४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर ४४९ विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी परीक्षेला कोरोनामुळे १८ विद्यार्थ्यांना मुकावे लागले, तर १७ विद्यार्थी रॅपिड अँटिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर असे कोणतेही कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत, तर ४१४ विद्यार्थ्यांनी वि्द्यापीठाच्या परीक्षा विभागाला अनुपस्थित राहण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे केवळ कोरोनाची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.