शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

२३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, ...

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, या परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आलेली असतानाही पहिल्याच दिवशी ९१.१ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांना उपस्थिती नोंदविल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या; परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पुनर्नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, २ जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती. परंतु, या परीक्षांसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने १० जूनपासून परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी.एस्सी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. या लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.

इन्फो-

कोरोनामुळे १८ विद्यार्थी परीक्षेला मुकले

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पहिल्या दिवशी राज्यभरातील १६७ परीक्षा केंद्रांवर सकाळच्या सत्रात सुमारे ४ हजार ९९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यातील ४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर ४४९ विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी परीक्षेला कोरोनामुळे १८ विद्यार्थ्यांना मुकावे लागले, तर १७ विद्यार्थी रॅपिड अँटिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर असे कोणतेही कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत, तर ४१४ विद्यार्थ्यांनी वि्द्यापीठाच्या परीक्षा विभागाला अनुपस्थित राहण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे केवळ कोरोनाची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.