शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

२३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, ...

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, या परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आलेली असतानाही पहिल्याच दिवशी ९१.१ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांना उपस्थिती नोंदविल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या; परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पुनर्नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, २ जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती. परंतु, या परीक्षांसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने १० जूनपासून परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी.एस्सी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. या लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.

इन्फो-

कोरोनामुळे १८ विद्यार्थी परीक्षेला मुकले

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पहिल्या दिवशी राज्यभरातील १६७ परीक्षा केंद्रांवर सकाळच्या सत्रात सुमारे ४ हजार ९९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यातील ४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर ४४९ विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी परीक्षेला कोरोनामुळे १८ विद्यार्थ्यांना मुकावे लागले, तर १७ विद्यार्थी रॅपिड अँटिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर असे कोणतेही कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत, तर ४१४ विद्यार्थ्यांनी वि्द्यापीठाच्या परीक्षा विभागाला अनुपस्थित राहण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे केवळ कोरोनाची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.