शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेत सहभागी व्हावे

By admin | Updated: September 22, 2016 00:58 IST

एस. टी. घुले : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन

त्र्यंबकेश्वर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रा. एस. टी. घुले यांनी केले.मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ डॉ. स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व घुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. एम. माळी, प्रा. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. छाया शिंदे, प्रा. दीपाली पडोळ, प्रा. देठे, प्रा. आर. डी. झनकर, प्रा. थोरात, प्रा. कांबळे, प्रा. मगर, प्रा. आशिष सोनवणे, प्रा. गावंडे, प्रा. आर. व्ही. जाधव, महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.याप्रसंगी घुले यांनी समाजात वावरणाऱ्या विविध वर्गांचे स्पष्टीकरण केले. मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, संपत्ती दानाबरोबरच मानवी अवयवदान हे दानात सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत व्यक्त करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. स्मिता पाटील यांनी महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होताना स्वयंसेवकांनी डोळसपणाने समाजपयोगी कामे करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून प्रा. डॉ. एस. एम. माळी यांनी कार्यक्रमाचा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेचा हेतू स्पष्ट केला. जगण्यासाठी शैक्षणिक, बुद्धिमत्तेबरोबर सामाजिक, भावनिक व आध्यात्मिक बुद्धिमत्तादेखील महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पूर्ण वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. काळे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमात सातत्याने विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये प्रेरणा देण्याचे काम करतात. कार्यालयीन प्रमुख तिडके, जगताप, गायकवाड व गोसावी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी कदम हिने केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रभाकर शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन भगवान गोऱ्हे याने केले. (वार्ताहर)जीवनात सकारात्मक विचारांची गरजराष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा हे तत्त्व जोपासून समाजाचे ऋण फेडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अलीकडे माणुसकीच्या धर्माचा ऱ्हास होत चालला आहे. माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी सेवा योजनेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. हे स्पष्ट करताना त्यांनी गॅलिलिओ, न्यूटन या शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. जीवनात सकारात्मक विचार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकसित होतात, असे स्पष्ट करून योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊ शकतो व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते, असे मत घुले यांनी व्यक्त केले.