शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST

नायगाव : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावे गजबजू लागली आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करून ...

नायगाव : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावे गजबजू लागली आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करून अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीत गावपुढा-यांच्या पाठोपाठ तळीरामांनाही सुगीचे दिवस आले आहे.

ग्रामीण भागातील सर्वात जास्त चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे बघितले जाते. याच निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. गाव विकासाचे केंद्र असलेल्या व ग्रामीण भागात सरपंच पदाला महत्त्व असल्यामुळे ही निवडणूक दिवसेंदिवस प्रतिष्ठेची बनत आहे. कोराेनामुळे लांबलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या १५ तारखेला होणार आहे. फाॅर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. कोणत्या वाॅर्डात कोणता उमेदवार सरस पडेल. तसेच कोणत्या इच्छुक उमेदवाराचा कसा उपयोग होईल, याचे पुरेपूर ज्ञान असलेल्या पुढाऱ्यांनी सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ऐन थंडीत निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याने गावामध्ये माणसांची गर्दी वाढू लागली आहे.

याचवेळी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावपुढा-यांबरोबर जवळच्या मित्रांना (तळीराम) ही मागणी वाढत आहे. संध्याकाळच्या कोपरा बैठकांना सध्या गर्दी जमू लागली आहे.

----------------------

बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न

निवडणूक म्हटल्यावर कार्यकर्ते व खर्च हा आलाच. तसेच उमेवारांच्या मायेचा पाझर फुटण्याचे प्रमाणही आपसूकच वाढते. यात सकाळचा (बळजबरीचा) रामराम, चहापाणी, नाश्त्यासह संध्याकाळच्या बैठकीवरही उमेदवारांना लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे येत्या काही दिवस तरी होऊ दे. खर्चाचीच चर्चा रंगणार आहे. सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असताना नायगाव खो-यातील काही गावांमध्ये ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याच्याही हालचाली सुरू आहे. वाद-विवादही टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही गट आग्रही दिसत आहे. तर काही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्यामुळे या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे खो-यात कही खुशी, कही गम असे वातावरण आहे.