शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST

नायगाव : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावे गजबजू लागली आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करून ...

नायगाव : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावे गजबजू लागली आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करून अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीत गावपुढा-यांच्या पाठोपाठ तळीरामांनाही सुगीचे दिवस आले आहे.

ग्रामीण भागातील सर्वात जास्त चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे बघितले जाते. याच निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. गाव विकासाचे केंद्र असलेल्या व ग्रामीण भागात सरपंच पदाला महत्त्व असल्यामुळे ही निवडणूक दिवसेंदिवस प्रतिष्ठेची बनत आहे. कोराेनामुळे लांबलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या १५ तारखेला होणार आहे. फाॅर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. कोणत्या वाॅर्डात कोणता उमेदवार सरस पडेल. तसेच कोणत्या इच्छुक उमेदवाराचा कसा उपयोग होईल, याचे पुरेपूर ज्ञान असलेल्या पुढाऱ्यांनी सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ऐन थंडीत निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याने गावामध्ये माणसांची गर्दी वाढू लागली आहे.

याचवेळी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावपुढा-यांबरोबर जवळच्या मित्रांना (तळीराम) ही मागणी वाढत आहे. संध्याकाळच्या कोपरा बैठकांना सध्या गर्दी जमू लागली आहे.

----------------------

बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न

निवडणूक म्हटल्यावर कार्यकर्ते व खर्च हा आलाच. तसेच उमेवारांच्या मायेचा पाझर फुटण्याचे प्रमाणही आपसूकच वाढते. यात सकाळचा (बळजबरीचा) रामराम, चहापाणी, नाश्त्यासह संध्याकाळच्या बैठकीवरही उमेदवारांना लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे येत्या काही दिवस तरी होऊ दे. खर्चाचीच चर्चा रंगणार आहे. सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असताना नायगाव खो-यातील काही गावांमध्ये ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याच्याही हालचाली सुरू आहे. वाद-विवादही टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही गट आग्रही दिसत आहे. तर काही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्यामुळे या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे खो-यात कही खुशी, कही गम असे वातावरण आहे.