शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

येवला शहरात मातंग समाज मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 19:54 IST

येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ

ठळक मुद्देराज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा

येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार छगन भुजबळ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जेष्ठ नेते माणिक शिंदे, पं स उपसभापती रु पचंद भागवत, जि. प. सदस्य महेंद्र काले, गायक चंदन कांबळे, जेष्ठ उद्योजक किशोर राठी, कामगार शक्तीचे अनिल सरवार, राधाकृष्ण सोनवणे, कोपरगावचे नगराध्यक्ष रवींद्र पाठक, येवला वसंत पवार, दीपक लोणारी, भारिप सिन्नरचे अध्यक्ष प्रविण जाधव आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी वस्ताद लहुजी साळवे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरू होते. त्यांनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लहुजी वस्ताद स्वत: लढले व त्यांनी अनेक क्र ांतिकारक घडविले म्हणून ते क्र ांतीगुरु असल्याचे सांगितले. सावित्रीबार्इंच्या शाळेत जाणाऱ्या पिहल्या मागासवर्गीय विध्यार्थीनी मुक्ता साळवे या लहुजी साळवे यांच्या नात होत्या. त्यांनी इंग्रज अधिकाºयांना उद्धेशून लिहिलेल्या निबंधाला आजही खूप महत्व आहे असेही भुजबळ म्हणाले.अध्यक्षीय भाषणातून राजू कांबळे यांनी सकल मातंग सामाजाच्या व्यथा मांडताना सांगितले की, मातंग समाज दिवसेंदिवस भूमिहीन होत आहे. समाजावर अत्याचार होत आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल.सर्व मातंग समाज संघटत झाला परंतु हक्काचं व्यासपीठ येवल्यासाठी उपलब्ध नव्हतं. समाजाचे प्रेरणास्थान लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व समाजाचा आदर्शवत इतिहास निर्माण करणारे वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक येवल्या तालुक्यात निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले. शासनाने दखल नाही घेतली तर स्वखर्चातून अतिशय सुंदर, सर्वांच्या माना अभिमानाने उंचावतील अशा स्मारकाची निर्मिती स्वखर्चातून करून देणार असल्याचे आश्वासन रु पचंद भागवत यांनी दिले.प्रारंभी शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी मातंग समाजाचा इतिहास सांगत समाजातील महापुरु षांविषयी माहिती देत प्रबोधन केले. यावेळी राज्यस्तरीय क्र ांतीगुरु पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रकाश लोंढे, प्रदीप सरोदे, विनोद राक्षे, चंदन कांबळे, अनिल कुंदे, दिनकरराव लांडगे, अंबादास खैरनार, संतोष आहिरे, अमोल आल्हाट, सचिन नेटारे, ज्ञानेश्वर पारखे, नामदेव साळवे, मीना शिरसाठ, बालुभाऊ आठवले, कृष्णा बडे, संजय कडनोर, सागर निकाळे आदींना यावेळी गौरविण्यात आले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोळसे, सल्लागार दिलीप सोळसे, कार्याध्यक्ष संजय तूपसैंदर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय दोडके, उपाध्यक्ष भागीनाथ कांबळे, कार्याध्यक्ष प्रमोद आदमाने, सरचिटणीस सुदाम कांबळे, चित्रा कांबळे, संपर्कप्रमुख वाल्मिक खैरनार, जिल्हाध्यक्ष परशराम साठे, महिला जिल्हाध्यक्ष मीरा आदमाने, येवला तालुकाध्यक्ष संजय खैरनार, महिला तालुकाध्यक्ष मालन सोळसे, शहराध्यक्ष बाळा जोगदंड, युवा तालुकाध्यक्ष राहुल पोळ, युवा शहराध्यक्ष करण आव्हाड, रावसाहेब आव्हाड, राकेश आव्हाड, आदींनी परिश्रम घेतले.(फोटो ०३ मातंग मेळावा) दीपप्रज्वलन करताना उपस्थित मान्यवर.(फोटो ०३ मातंग मेळावा १)(फोटो ०३ मातंग मेळावा २)