नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या निरंतर मतदार नोंदणी मोहिमेत एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यास निवडणूक यंत्रणेने नकार दिला असून, त्याचबरोबर मतदाराकडून सादर केलेल्या अर्जांची जागेवरच छाननी व त्यातील त्रुटी, पुराव्यांची तपासणी करूनच अर्ज स्वीकृत केला जात असल्याने जेणेकरून मतदार यादीत पुन्हा चुकांची दुरुस्ती टाळणे सोपे होणार आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेला मतदारांचा पाहिजे तसा प्रतिसाद नसला, तरी या संदर्भातील चौकशी व मतदार नोंदणीच्या अर्जांची मागणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत अर्र्ज नेऊन मोजक्याच मतदारांनी भरून सादर केले आहेत. या मोहिमेत मतदारांकडून भरून दिलेला अर्ज जागेवरच तपासून त्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिली जात असून, अपूर्ण व पुरावे नसतील तर अर्ज नाकारण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे नंतर मतदाराचा अर्ज नामंजूर केला तर त्याची कारणमीमांसा करणे अवघड होते, त्याचबरोबर मतदार यादीतील चुकाही टाळणे यामुळे शक्य होणार आहे. नवीन मतदार नोंदणीचे एकगठ्ठा अर्ज स्वीकारण्यास पूर्णत: हरकत घेण्यात आली असून, कुटुंबातील अर्ज मात्र एका सदस्याने एकत्र सादर केले तर त्याचा पुरावा पाहून ते घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची एकगठ्ठा नोंदणीची संधी आपोआपच नाकारली गेली आहे.
एकगठ्ठा मतदार अर्जाला हरकत
By admin | Updated: May 31, 2014 00:27 IST