शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

नायगाव-पिंपळगाव रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 18:55 IST

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडला जाणारा नायगाव-पिंपळगाव (निपाणी) या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. संबंधित विभाग शेवटच्या भागाकडे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देतेथील खडीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडला जाणारा नायगाव-पिंपळगाव (निपाणी) या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. संबंधित विभाग शेवटच्या भागाकडे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.नायगाव - पिंपळगाव हा सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून तेथील खडीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्धातासाचा वेळ जास्त लागत आहे. तसेच मोकळ्या खडीमुळे वाहने नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.पिंपळगाव येथील ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार नायगावशी निगडीत असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते. तसेच शेतकऱ्यांना नाशिक येथे शेतीमाल नेण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. मात्र या मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकºयांना शेतीमाल बाजारात वेळेत नेण्यासाठी लांबच्या सायखेडा मार्गाने जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक झळ शेतकºयांना सोसावी लागत आहे.सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल व खड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांची फसगत होऊन अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची वेळीच दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दोन तालुक्यांच्या गावांना जोडणाºया या महत्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासुन संबंधित विभागाने दुरूस्ती व नुतनीकरण केले नाही. दोन्ही तालुक्यांचे शेवटचे गावे असल्यामुळे या रस्त्याकडे जाणून-बुजून बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.- सुनिल कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते, नायगाव.