शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुसळधार

By admin | Updated: July 10, 2016 21:50 IST

आनंदोत्सव : गोदावरी, दारणा, बाणगंगा, म्हाळुंगी नद्यांना पूर

 नाशिक : जिल्ह्यात रविवारी पुन्हा संततधार व धुवाधार पाऊस झाला असून, सर्व नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात पावसात भिजण्यासाठी व पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली. सुटीचा दिवस असल्याने हौशी नागरिकांनी आपल्या गाड्या थेट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वळविल्या. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात प्रचंड पाऊस झाला. ओझर परिसरात बाणगंगा नदीला पूर आल्याने गावातील तीनही पूल पाण्याखाली बुडाले.इगतपुरी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसारा घाट परिसरात आज पुन्हा मुसळधारेसह संततधार व धुवाधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत पुन्हा १७१ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून धुवाधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाबरोबर दाट धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्गसुद्धा मंदावल्याचे चित्र होते. शहरात आजअखेर (दि. १०) ८९२ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १७१ मिलिमीटर पावसाची धुवाधार बरसात झाली आहे. दरम्यान, या सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. दरम्यान, २४ तासात घोटी शहरात १०० मिमी, तर धरण परिक्षेत्रात १४३ मिमी, तसेच इगतपुरी शहरात विक्रमी १७१ मिमी, दारणा धरण क्षेत्रात व परिसरात ४३ मिमी, भावली धरण परिसरातही विक्रमी १८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.लोहोणेर : लोहोणेर व परिसरात आज दुपारनंतर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने व सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. काल दुपारी लोहोणेर व परिसरात पावसाने आपली हजेरी लावली. गेल्या एक महिन्यापासून बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. आर्द्रा नक्षत्राच्या भरवशावर केलेली पेरणी वाया जाते की काय, अशी भीती बळीराजा व्यक्त करीत होता. मात्र आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून चणकापूर धरण क्षेत्रात तसेच कळवण व देवळा तालुक्यात पावसाने आपली हजेरी लावल्याने कसमादेची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पात्र दुथडी भरून वाहु लागले आहे. एकंदरीत आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.निफाड : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने व तोही दमदारपणे पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निफाड येथे रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ८०.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.मागे ८ ते १० दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात केली होती; परंतु तो पाऊस लगेच थांबल्याने बळीराजा धास्तावला होता. आता शनिवारी रात्री १ च्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रविवारी तालुक्यात दिवसभर पडत असलेला पाऊस कधी एकदम जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपाचा होता. संततधार पाऊस पडत असल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्या-नाले भरले तुडुंबपेठ : सलग ४८ तासांपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे़ पेठ शहर व तालुक्यात शनिवारपासून संततधार पावसाने सुरुवात केली असून, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे़ मुसळधार पावसाने सर्व व्यवहार ठप्प झाले असले, तरी दुष्काळाने होरपळून निघालेल्या जनतेला हा पाऊस हवाहवासा वाटत आहे़(लोकमत चमू)