शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जिल्ह्यात मुसळधार

By admin | Updated: July 10, 2016 21:50 IST

आनंदोत्सव : गोदावरी, दारणा, बाणगंगा, म्हाळुंगी नद्यांना पूर

 नाशिक : जिल्ह्यात रविवारी पुन्हा संततधार व धुवाधार पाऊस झाला असून, सर्व नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात पावसात भिजण्यासाठी व पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली. सुटीचा दिवस असल्याने हौशी नागरिकांनी आपल्या गाड्या थेट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वळविल्या. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात प्रचंड पाऊस झाला. ओझर परिसरात बाणगंगा नदीला पूर आल्याने गावातील तीनही पूल पाण्याखाली बुडाले.इगतपुरी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसारा घाट परिसरात आज पुन्हा मुसळधारेसह संततधार व धुवाधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत पुन्हा १७१ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून धुवाधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाबरोबर दाट धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्गसुद्धा मंदावल्याचे चित्र होते. शहरात आजअखेर (दि. १०) ८९२ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १७१ मिलिमीटर पावसाची धुवाधार बरसात झाली आहे. दरम्यान, या सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. दरम्यान, २४ तासात घोटी शहरात १०० मिमी, तर धरण परिक्षेत्रात १४३ मिमी, तसेच इगतपुरी शहरात विक्रमी १७१ मिमी, दारणा धरण क्षेत्रात व परिसरात ४३ मिमी, भावली धरण परिसरातही विक्रमी १८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.लोहोणेर : लोहोणेर व परिसरात आज दुपारनंतर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने व सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. काल दुपारी लोहोणेर व परिसरात पावसाने आपली हजेरी लावली. गेल्या एक महिन्यापासून बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला होता. आर्द्रा नक्षत्राच्या भरवशावर केलेली पेरणी वाया जाते की काय, अशी भीती बळीराजा व्यक्त करीत होता. मात्र आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून चणकापूर धरण क्षेत्रात तसेच कळवण व देवळा तालुक्यात पावसाने आपली हजेरी लावल्याने कसमादेची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पात्र दुथडी भरून वाहु लागले आहे. एकंदरीत आज पावसाने दिवसभर आपली हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.निफाड : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने व तोही दमदारपणे पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निफाड येथे रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ८०.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.मागे ८ ते १० दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात केली होती; परंतु तो पाऊस लगेच थांबल्याने बळीराजा धास्तावला होता. आता शनिवारी रात्री १ च्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रविवारी तालुक्यात दिवसभर पडत असलेला पाऊस कधी एकदम जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपाचा होता. संततधार पाऊस पडत असल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्या-नाले भरले तुडुंबपेठ : सलग ४८ तासांपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे़ पेठ शहर व तालुक्यात शनिवारपासून संततधार पावसाने सुरुवात केली असून, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे़ मुसळधार पावसाने सर्व व्यवहार ठप्प झाले असले, तरी दुष्काळाने होरपळून निघालेल्या जनतेला हा पाऊस हवाहवासा वाटत आहे़(लोकमत चमू)