शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही मास्क सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:21 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी आपात्कालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून शहरात रात्रीची संचारबंदी लागू ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी आपात्कालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर जिल्ह्यात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. शहरात याबाबतची अंमलबजावणी सुरू झाली असताना आता ग्रामीण भागातही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, सर्व आस्थापना, सभा, समारंभ तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जमणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे; मात्र मास्कचा वापर केला जात नसेल तर अशा व्यक्तींकडून हजार रुपयांचा दंड करण्याची कारवाई करावी, असे आदेश जिल्हधिकाऱ्यांनी काढले आहेत. कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेचा हिशेबदेखील तहसील कार्यालयाने ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

साथरोग कायद्याच्या अधिनियमानुसार जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याबाबतचे आदेश शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न सोहळ्यांची गर्दी लक्षात घेता लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर अधिक लक्ष केंद्रित केेले जाणार आहे. तहसील कार्यालयाकडून याबाबतची माहिती मंगल कार्यालये, लॉन्स संचालकांना देण्यात आलेली आहे. गर्दी झाल्यास अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पनादेखील दिली जात आहे.