शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

धांद्री येथे विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2017 23:37 IST

सटाणा : माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शेतजमीन घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सासू, पतीसह चौघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. निफाड तालुक्यातील रामनगर (सायखेडा) येथील लाइनमन शिवगीर तुळशीराम गोसावी यांनी मुलगी शीतल हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील धांद्री येथील केदा त्र्यंबक गोसावी याच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे लावून दिला होता. चार वर्षं सुखाने संसार सुरू होता. शीतलला प्रथमेश, दर्शन हे दोन मुले झाल्यानंतर तिचा रिक्षा घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळींची ही मागणी पूर्ण केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेजारील नातेवाईक राकेश गोसावी यांनी तिचा बचाव केला.  या प्रकारामुळे शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळीची भेट घेऊन काही दिवस व्यवहार थांबवून घ्या पैसे उपलब्ध झाल्यावर व्यवहार पूर्ण करू असे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या शुक्रवारी रात्री सासरच्या जाचाला कंटाळून घराजवळील विहिरीत उडी घेऊन शीतलने जीवन यात्रा संपविली. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी सासरकडील चौघांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.