शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

शोकमग्न वातावरणाच लागला निकाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST

मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील मणियार समाजातील वऱ्हाडी मंडळी ताज लक्झरी बसने गुजरातला गेले; परंतु रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ...

मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील मणियार समाजातील वऱ्हाडी मंडळी ताज लक्झरी बसने गुजरातला गेले; परंतु रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले; मात्र तरीही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात ‘निकाह’ पार पाडण्यात आला.

शब्बीरनगरमधील हाजी शेख अहेमद शेख भिकन यांचा मुलगा मुद्दस्सीर शेख याचा विवाह सूरतच्या शेख खलील गनी मणियार यांची मुलगी सुमैय्याबी हिचे बरोबर ठरला होता. लग्नापूर्वीचे सवर विधी आटोपून साधेपणाने विवाह करण्याचे ठरले. त्यानुसार शब्बीरनगरमधील गल्लीतील शेजारी कुणालाही बरोबर नेले नाही. केवळ पिलखोड आणि धुळे येथील निवडक नातलगांना घेऊन एका ट्रॅव्हल्स्‌मधून ‘वऱ्हाडी’ सूरतला जात होते. रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. नववधूच्या घरी अपघाताचे वृत्त कळताच शोककळा पसरली. जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. घरातील ज्येष्ठ मंडळींनी तशातच साधेपणाने विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुद्दशीर आणि सुम्मैया यांचा निकाह लावण्यात आला. यावेळी मात्र वऱ्हाडासह दोन्ही बाजूंच्या नातलगांनी हंबरडा फोडला. हाजी अहमद शेख यांचे शब्बीर नगरात जिलेबी, भजीचे हॉटेल आहे. त्यांना तीन मुले असून, तिन्ही मुले रिक्षा चालवितात. घरात पहिलेच लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते. पहाटे एक वाजता वऱ्हाड सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, ‘वऱ्हाडी’च्या नशिबी काय लिहिले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. परंतु नियतीने अखेर घाला घातलाच.

इन्फेो;

कारागीर हॉटेलवरच

शब्बीर नगरातील हाजी अहमद यांच्या हॉटेलवर गेल्या अनेक वर्षांपासून कारागीर काम करीत आहे; मात्र त्यांनाही नेण्यात आले नव्हते. तो आज हॉटेल सांभाळत असताना त्याला ‘अपघाता’ची खबर मिळाली. तोही धाय मोकलून रडू लागला. दुपारी घराजवळ गर्दी जमायला सुरुवात झाली अन्‌ सर्व सूरतला फोन लावून हालहवाल विचारत असल्याचे दिसून आले.