शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

लग्नसराई, सुट्ट्यांमुळे मतदानाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. त्यातच सिडको - सातपूर पट्ट्यातील उत्तर भारतीयदेखील मूळ गावी मतदानासाठी जात असल्याने हीसुद्धा राजकीय पक्षांना अडचणीत आणणारी बाब ठरली आहे.अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. तसा प्रत्येक पक्षाच्या विचाराला बांधील मतदार वर्ग ठिकठिकाणी असतोच. परंतु मतदान करून घेणे हे फार मोठे आव्हानात्मक काम असते. त्यामुळेच अनेकदा उमेदवारांना मतदारांसाठी गाड्यांची सोय करण्यासारखे अनुचित प्रकारदेखील करावे लागतात. हक्काचे मतदान सुटू नये हा त्यामागचा उद्देश असतो. यंदा ऐन एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून, अनेक कारणांमुळे हक्काचे मतदान कसे होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मध्यंतरी पाऊस पडला असला तरी तत्पूर्वी तापमान चाळीस अंशांपर्यंत गेले होते. नाशिक शहरातही अशा कडक उन्हाच्या वेळी रहदारीचे रस्ते ओस पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा होत असतात. परीक्षा संपल्यानंतर पालक मुलांना घेऊन बाहेर गावी निघून जातात. त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर गेला तर मतदान करून घेणेदेखील अडचणीचे ठरणार आहे.सर्वाधिक चिंतेचा विषय लग्न सोहळ्यांचा आहे. पुढील आठवड्यात तसेच २९ एप्रिल रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशीदेखील लग्नाची तिथी असल्याने अनेक नागरिक त्यात व्यस्त असतील तसेच अन्यत्र लग्न सोहळ्यासाठी गेलेल्यांमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असून, ही बाबदेखील अडचणीची ठरणार असून, संबंधिताना मतदानासाठी कसे प्रवृत्त करता येईल हा अडचणीचा भाग ठरला आहे.उत्तर भारतीयांची मनधरणीउत्तर भारतातदेखील अनेक टप्प्यात मतदान होत असून, अशावेळी नाशिक शहरातील सिडको-सातपूर भागातील विशेषत: अंबड लिंकरोड, अशोकनगर, शिवाजीनगर, कामगारनगर अशा अनेक भागांत असलेल्या उत्तर भारतीयदेखील मूळ गावी गेले आहेत किंवा जात आहेत तर काही जण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतरदेखील सुटीत गावी जातात. त्याचादेखील मतदानाला फटका बसण्याची शक्यता असून, अशावेळी त्यांना मतदान झाल्यानंतर गावी जाण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल याविषयीदेखील राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहे. पुढील आठवड्यात २३ तसेच २६ एप्रिल रोजी लग्नाची तिथी आहे. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजीदेखील लग्नाची तिथी आहे. त्याचा मतदानाला फटका बसू शकतो. अर्थात, मतदान करणे हे काम प्राधान्याने केले पाहिजे.- नरेंद्र धारणे गुरुजी, पंचवटी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक