शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

लग्नसराई, सुट्ट्यांमुळे मतदानाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. त्यातच सिडको - सातपूर पट्ट्यातील उत्तर भारतीयदेखील मूळ गावी मतदानासाठी जात असल्याने हीसुद्धा राजकीय पक्षांना अडचणीत आणणारी बाब ठरली आहे.अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. तसा प्रत्येक पक्षाच्या विचाराला बांधील मतदार वर्ग ठिकठिकाणी असतोच. परंतु मतदान करून घेणे हे फार मोठे आव्हानात्मक काम असते. त्यामुळेच अनेकदा उमेदवारांना मतदारांसाठी गाड्यांची सोय करण्यासारखे अनुचित प्रकारदेखील करावे लागतात. हक्काचे मतदान सुटू नये हा त्यामागचा उद्देश असतो. यंदा ऐन एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून, अनेक कारणांमुळे हक्काचे मतदान कसे होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मध्यंतरी पाऊस पडला असला तरी तत्पूर्वी तापमान चाळीस अंशांपर्यंत गेले होते. नाशिक शहरातही अशा कडक उन्हाच्या वेळी रहदारीचे रस्ते ओस पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा होत असतात. परीक्षा संपल्यानंतर पालक मुलांना घेऊन बाहेर गावी निघून जातात. त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर गेला तर मतदान करून घेणेदेखील अडचणीचे ठरणार आहे.सर्वाधिक चिंतेचा विषय लग्न सोहळ्यांचा आहे. पुढील आठवड्यात तसेच २९ एप्रिल रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशीदेखील लग्नाची तिथी असल्याने अनेक नागरिक त्यात व्यस्त असतील तसेच अन्यत्र लग्न सोहळ्यासाठी गेलेल्यांमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असून, ही बाबदेखील अडचणीची ठरणार असून, संबंधिताना मतदानासाठी कसे प्रवृत्त करता येईल हा अडचणीचा भाग ठरला आहे.उत्तर भारतीयांची मनधरणीउत्तर भारतातदेखील अनेक टप्प्यात मतदान होत असून, अशावेळी नाशिक शहरातील सिडको-सातपूर भागातील विशेषत: अंबड लिंकरोड, अशोकनगर, शिवाजीनगर, कामगारनगर अशा अनेक भागांत असलेल्या उत्तर भारतीयदेखील मूळ गावी गेले आहेत किंवा जात आहेत तर काही जण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतरदेखील सुटीत गावी जातात. त्याचादेखील मतदानाला फटका बसण्याची शक्यता असून, अशावेळी त्यांना मतदान झाल्यानंतर गावी जाण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल याविषयीदेखील राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहे. पुढील आठवड्यात २३ तसेच २६ एप्रिल रोजी लग्नाची तिथी आहे. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजीदेखील लग्नाची तिथी आहे. त्याचा मतदानाला फटका बसू शकतो. अर्थात, मतदान करणे हे काम प्राधान्याने केले पाहिजे.- नरेंद्र धारणे गुरुजी, पंचवटी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक