शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राज्यव्यापी आंदोलनातही बाजार समित्या सुरूच ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

लासलगाव : ज्या तातडीने कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र ...

लासलगाव : ज्या तातडीने कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे; परंतु त्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीने आपले कांदा लिलावाचे कामकाज बंद ठेवू नये, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.

सुरुवातीला लाॅकडाऊनच्या काळामध्ये काही बाजार समित्या सलग २-२ महिने, काही बाजार समित्या कधी आठवडा तर कधी २ आठवडे अशा बंद राहिल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडाभरात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज बंद होते. पुढे दिवाळीत नाशिक जिल्ह्याच्या बाजार समित्या १० दहा दिवस बंद होत्या. बाजार समित्यांचे कामकाज सतत बंद राहून पुन्हा सुरू झाल्यानंतर एकदम कांद्याची जास्त आवक होऊन कांद्याचे बाजारभाव अजून कोसळतात. कांदा उत्पादकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाशिक, धुळे, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये तहसीलदार यांना कांद्याची निर्यातबंदी तत्काळ हटवावी, यासाठी निवेदन, पत्र देण्यात आले असून, पुढील आठवड्यात राज्यव्यापी रेल रोको व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

इन्फो

..तर बरखास्तीची कारवाई करा!

कांद्यावरील निर्यात खुली होत नाही तोपर्यंत राज्यभर राज्य कांदा उत्पादक संघटनेचा लढा सुरूच राहील; परंतु सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी राज्यातील बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव बंद राहिल्यास संबंधित बाजार समित्यांवर बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारला करण्यात येईल, असेही दिघोळे यांनी स्पष्ट केले आहे.

इन्फो

शेतकरी हवालदिल

कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटलला चार हजारांच्या घरात गेल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदी केली. त्यानंतर परदेशी कांदा आयात करणे सुरू केले तसेच कांदा व्यापारी यांना साठा मर्यादा घालून दिल्या. या आणि अशा अनेक एकामागून एक निर्बंधांमुळे कांद्याचे बाजारभाव घसरत राहिले. आता या आठवड्यात लासलगावसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे दर सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल इतके घसरल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.