शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

शेतकºयांचा बाजार समिती कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:18 IST

उन्हाळ कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापाºयांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले आहेत. व्यापाºयांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी गुरुवारी (दि. २६) येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.

सटाणा : उन्हाळ कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापाºयांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले आहेत. व्यापाºयांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी गुरुवारी (दि. २६) येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, सचिव भास्कर तांबे यांनी शेतकºयांच्या भावना समजून घेत ल्या . दिवाळी सणामुळे व्यापाºयांकडे मजुरांची टंचाई असल्यामुळे खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लावता येत नाही. नव्याने कांदा खरेदी केल्यास शासनाला साठेबाजी दिसून येते अशा कात्रीत व्यापारी सापडल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे तब्बल एक तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे उन्हाळ कांद्याला मागणी वाढल्यामुळे भावात तेजी आली आहे. दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी भावात गेल्या तीन दिवसांपासून तेजी राहिली आहे. कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शासनाने पुन्हा व्यापाºयांच्या साठेबाजीवर मर्यादा आणून कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज सटाणा बाजार समिती आवारात व्यापाºयांनी मजूर टंचाईमुळे दररोज दोनशे वाहनेच कांदा खरेदी करण्याची भूमिका घेतली. त्यात एकाच दिवसात सरासरी भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी शेतकरी मनोज सोनवणे, किरण रौंदळ, लक्ष्मण सोनवणे, मोतीराम चौधरी आदी शेतकºयांनी शासनाच्या नावाने व्यापारी कांद्याचे भाव पाडत असल्याचा आरोप केला. दररोज तीनशे ते चारशे वाहने लिलावासाठी येतात; मात्र दोनशे वाहनांच्या वरती कांद्याचा लिलाव केला जात नाही. हा कोणता नियम आहे, असा जाब यावेळी सभापती रमेश देवरे, सचिव तांबे यांना विचारत असतानाच एकाने जिल्हाधिकाºयांनी दोनशे वाहनाच्या वरती कांदा खरेदी करू नये, असे सांगितल्याने गोंधळात अधिकच भर पडली. सभापती देवरे यांनी शेतकºयांच्या भावना समजून घेत त्यांना शांततेचे आवाहन केले. ते म्हणाले की, शासनाने व्यापाºयांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा आणली आहे. त्यामुळे शासनाला दररोज कांदा खरेदीबाबत अहवाल सादर करावा लागत आहे. अशा परिस्थिती दिवाळी सणामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. दिवाळीपूर्वी खरेदी केलेल्या मालाची अद्याप विल्हेवाट लागलेली नाही. त्यात आज कांदा खरेदी केल्यास साठेबाजी दिसून कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने व्यापारी कांदा खरेदी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे सचिव तांबे यांनी सांगितले. शेतकºयांनीदेखील भावाबाबत गोंधळून न जाता टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणल्यास आवक मर्यादित राहून भाव मिळतील, असे आवाहन केले.त्यानंतर आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक किरण अहिरे, लालचंद सोनवणे, वसंतराव सोनवणे, शरद शेवाळे, कारभारी पगार, जिभाऊ मोरकर, साहेबराव सोनवणे, अतुल पवार आदी उपस्थित होते.