शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याची तक्रार

By admin | Updated: January 20, 2017 00:06 IST

त्र्यंबकेश्वर : जागा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा जमीनमालकाच्या वारसांचा आरोप

त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक कृउबा समितीने खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असून, याबाबत मूळमालकांना नाशिक कृउबाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी धमका-वल्याची तक्रार दाखल केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी भाऊ मोरे यांची गट नं. १०४ एकूण क्षेत्र १ हेक्टर ७० आर शेतजमीन होती. सन १९७२ साली या जमिनीतून १ हेक्टर १७ आर क्षेत्र त्र्यंबकेश्वर सहकारी भातगिरणी यांना (दक्षिणेकडील) विक्री केले होते. त्यासाठीचे रितसर खरेदीखतही झालेले होते. भातगिरणीने ०.५ गुंठे जागा शेतकरी सहकारी संघास विक्री केली होती. तसेच ५८.५ क्षेत्र कृउबा समितीला विक्र ी केले, तर ५८.५ क्षेत्र नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला विक्री करण्यात आले आहे. उर्वरित उत्तरेकडील क्षेत्र मूळ मालक मयत गणपत भाऊ मोरे यांच्या सध्याच्या वारसांच्या कब्जेवहिवाटीत आहे. त्यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात तारेचे कुंपण केले आहे. दरम्यान, संपूर्ण गटाची मोजणी केली असता गटाच्या दक्षिणेकडील गट नं. १०५च्या मालकाचे २५ गुंठे जागेत अतिक्रमण झाल्याचे जागेच्या नकाशावरून दिसत आहे. याबाबत जमीनमालकाच्या वारसांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित लोकांनी पोलीस ठाण्यातदेखील १०००/५०० माणसे आणून रातोरात कुंपण तोडण्याची धमकी दिली आहे. वास्तविक, महाराष्ट्र को-आॅप. बँकेने जागा जप्त केलेली असताना पोलीस ठाण्यातच संबंधितांनी बळाचा वापर करून धमकी देण गैर आहे. बाजार समितीने दिलेल्या तक्र ार अर्जात म्हटले आहे की, जागेबाबत न्यायालयीन वाद चालू असून, निकाल लागेपर्यंत तारेचे कुंपण लावू नका. निकाल लागल्या-नंतर रितसर चतु:सीमेप्रमाणे खुणा करून त्यानंतरच कुंपण लावावे. येथे मराठा विद्याप्रसारक समाजाने आपल्या इमारतीचे बांधकाम करताना बाजार समितीच्या जागेकडे बांधकाम केले आहे, तर गट नं.१०५ (दक्षिणेकडे) गेलेली सुमारे २५ गुंठे जागा सोडून दिली आहे. त्यामुळेच हा वाद उद्भवला असल्याचे बोलेले जात आहे. सध्या तरी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जागेमागे शुक्लकाष्ट लागले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत दोन ते तीन पंचवार्षिकपासून त्र्यंबकेश्वरला उपबाजार आवार सुरू करू तसेच शेतकऱ्यांच्या युवावर्गासाठी बाजार समितीतर्फे गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देऊन मते मिळविली; शेवटी ते स्वप्नच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)