शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याची तक्रार

By admin | Updated: January 20, 2017 00:06 IST

त्र्यंबकेश्वर : जागा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा जमीनमालकाच्या वारसांचा आरोप

त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक कृउबा समितीने खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असून, याबाबत मूळमालकांना नाशिक कृउबाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी धमका-वल्याची तक्रार दाखल केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी भाऊ मोरे यांची गट नं. १०४ एकूण क्षेत्र १ हेक्टर ७० आर शेतजमीन होती. सन १९७२ साली या जमिनीतून १ हेक्टर १७ आर क्षेत्र त्र्यंबकेश्वर सहकारी भातगिरणी यांना (दक्षिणेकडील) विक्री केले होते. त्यासाठीचे रितसर खरेदीखतही झालेले होते. भातगिरणीने ०.५ गुंठे जागा शेतकरी सहकारी संघास विक्री केली होती. तसेच ५८.५ क्षेत्र कृउबा समितीला विक्र ी केले, तर ५८.५ क्षेत्र नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला विक्री करण्यात आले आहे. उर्वरित उत्तरेकडील क्षेत्र मूळ मालक मयत गणपत भाऊ मोरे यांच्या सध्याच्या वारसांच्या कब्जेवहिवाटीत आहे. त्यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात तारेचे कुंपण केले आहे. दरम्यान, संपूर्ण गटाची मोजणी केली असता गटाच्या दक्षिणेकडील गट नं. १०५च्या मालकाचे २५ गुंठे जागेत अतिक्रमण झाल्याचे जागेच्या नकाशावरून दिसत आहे. याबाबत जमीनमालकाच्या वारसांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित लोकांनी पोलीस ठाण्यातदेखील १०००/५०० माणसे आणून रातोरात कुंपण तोडण्याची धमकी दिली आहे. वास्तविक, महाराष्ट्र को-आॅप. बँकेने जागा जप्त केलेली असताना पोलीस ठाण्यातच संबंधितांनी बळाचा वापर करून धमकी देण गैर आहे. बाजार समितीने दिलेल्या तक्र ार अर्जात म्हटले आहे की, जागेबाबत न्यायालयीन वाद चालू असून, निकाल लागेपर्यंत तारेचे कुंपण लावू नका. निकाल लागल्या-नंतर रितसर चतु:सीमेप्रमाणे खुणा करून त्यानंतरच कुंपण लावावे. येथे मराठा विद्याप्रसारक समाजाने आपल्या इमारतीचे बांधकाम करताना बाजार समितीच्या जागेकडे बांधकाम केले आहे, तर गट नं.१०५ (दक्षिणेकडे) गेलेली सुमारे २५ गुंठे जागा सोडून दिली आहे. त्यामुळेच हा वाद उद्भवला असल्याचे बोलेले जात आहे. सध्या तरी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जागेमागे शुक्लकाष्ट लागले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत दोन ते तीन पंचवार्षिकपासून त्र्यंबकेश्वरला उपबाजार आवार सुरू करू तसेच शेतकऱ्यांच्या युवावर्गासाठी बाजार समितीतर्फे गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देऊन मते मिळविली; शेवटी ते स्वप्नच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)