शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाजार समितीत भाजीपाला आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी भयभीत झाल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत दाखल होणाऱ्या शेतमालावर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उलढालीवर झाला आहे. गत १० ते १५ दिवसांपासून बाजार समितीत ३५ ते ४० टक्के शेतमाल आवक घटली आहे.

इन्फो बॉक्स====

बळीराजा अडचणीत

कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासनाने १५ दिवस निर्बंध लागू केले आहेत. बाजार समितीत येणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी वर्गाने काय काळजी घ्यावी याबाबत वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तसेच व्यवहार करताना सुरक्षित अंतराचे पालन केले जात असून, विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण वाढत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रोजची शेतमाल आवक कमी झाल्याने बळीराजा पुन्हा कोरोना संकटामुळे अडचणीत सापडला आहे.

-देवीदास पिंगळे, सभापती बाजार समिती, नाशिक