शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत भाजीपाला आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी भयभीत झाल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत दाखल होणाऱ्या शेतमालावर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उलढालीवर झाला आहे. गत १० ते १५ दिवसांपासून बाजार समितीत ३५ ते ४० टक्के शेतमाल आवक घटली आहे.

इन्फो बॉक्स====

बळीराजा अडचणीत

कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासनाने १५ दिवस निर्बंध लागू केले आहेत. बाजार समितीत येणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी वर्गाने काय काळजी घ्यावी याबाबत वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तसेच व्यवहार करताना सुरक्षित अंतराचे पालन केले जात असून, विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण वाढत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रोजची शेतमाल आवक कमी झाल्याने बळीराजा पुन्हा कोरोना संकटामुळे अडचणीत सापडला आहे.

-देवीदास पिंगळे, सभापती बाजार समिती, नाशिक