शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...

By admin | Updated: September 13, 2014 21:25 IST

कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...

कळवण : नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबर नवनिर्मितीचा ध्यास घेऊन तालुक्यात झेंडूची शेती केल्याने झेंडूची शेती बहरली आहे. अनेक शेतकरी आता झेंडू शेतीकडे वळले आहेत.उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या यात्रोत्सवात देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात, या परिसरातील आदिवासी बांधव यात्राकाळाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची लागवड करतात, मात्र फुलांची मागणी अधिक असल्याने शिर्डी व अन्य शहरातून झेंडूची आयात केली जात ेहोती. कालांतराने तालुक्यातीलच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूचे उत्पादन करण्यास सुरुवात केल्याने सप्तशृंग गडाबरोबरच राज्यातल्या अन्य ठिकाणीही झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात तसेच दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. मुंबईत दादर येथे तर गुजरातमधल्या अहमदाबाद येथेही झेंडूला मोठी बाजारपेठ असून, तालुक्यातील बहुसंख्य झेंडू उत्पादक शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्रीस नेत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो असलेला भाव नवरात्रोत्सव व दिवाळीच्या काळात ९० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.कळवण तालुक्यात आजमितीस निवाणे, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, दह्याणे, आठंबे, पाळे पिंपरी आदि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली जात आहे. योग्य नियोजन व योग्य भाव हे झेंडू फूलशेतीच्या लागवडीचे गमक असून, झेंडू लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षापासून झेंडू शेतीविषयी कृषी विभागाकडून मार्गदर्शन व सल्ला मिळत असल्याने झेंडू शेतीकडे कल वाढला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. लागवड केल्याच्या ४५ दिवसांनंतर झेंडू फुले निघण्यास सुरुवात होते. झेंडूची लागवड लाभदायी असून, त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे झेंडू उत्पादक शेतकरी बांधवांनी सांगितले.