शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना शिधापत्रिकेचा विषय लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:47 IST

नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलनानंतर २६२ पैकी तीस कुटूंबाची यादी जाहीर

नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान आंदोलकांना तहसीलदार उदय कुलकर्णी सामोरे गेले त्यांनी पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण २६२ दिव्यांग कुटूंबाचे अर्जाची पडताळणी करून आधार सिडींग नुसार तीस अर्जदारांना शिधापत्रिका देत असल्याचे जाहीर केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत असलो तरी एकूण सर्वच दिव्यांगांना शिधापत्रिकेचा लाभ मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.पाच महिन्यापूर्वी दिव्यांगांना शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याच्या मुद्दयांवर तहसीलदारांच्या दालनात झालेल्या चर्चेवेळी अंतोदय यादीत समावेश करून शिधापत्रिका देण्याचे पुरवठा विभागाने काबुल होते. मात्र त्यावर पुरवठा विभागाने कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने राज्याच्या समन्वयक संध्या जाधव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे, संतोष मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अनीस शेख, मनमाड शहर अध्यक्ष जाफर शहा, नांदगावचे शहराध्यक्ष राजू कटारे, ज्ञानेश्वर मुकुंद, दीपक सोळाशे, भाऊसाहेब पवार, हिरामण मनोहर आदींच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या दिव्यांग बांधवानी दिवसभर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात रिपाईचे दिनकर धीवर देविदास मोरे ही सहभागी झाले होते.तालुक्यातील दिव्यांगांचा अंतोदय यादीत समावेश झाला नसल्याने शिधापत्रिकेवरील राष्ट्रीय सुरक्षा योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेवटी गुरुवारी आंदोलन झाले.तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी धरणेस्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यात प्राप्त एकूण २६२ दिव्यांग कुटुंबांचे अर्जाची पडताळणी केली असता ज्या शिधापत्रिका आधार सीडिंग होऊन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत. अशा ५८ अर्जदार दिव्यांग कुटुंबाना शासन परिपत्रकानुसार व त्याच्या पात्र योजनेन्वये तात्काळ राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ सुरु करण्यात आलेला आहे.उर्वरित अर्जदार व्यक्तीचे आधार सीडिंग सुरु असून अर्जदारचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंद करून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे तसेच ज्या दिव्यांग गरजू कुटुंबानी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे अशा ३० अर्जदार कुटुंबांची यादी निश्चित करून त्यांना शिधापत्रिका देण्याची तजवीज करत आहेत.असे कळविण्यात आले 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप