शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:52 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे.

ठळक मुद्देसुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्कार

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे. त्यामुळे मराठी माणसानेही मराठीच्या वैभवाचेच गुणगान करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे गंगापूररोड परिसरातील एका मंगल कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात विद्यापीठाच्या वतीने नाशिकच्या सुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा तर मुंबई येथील दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नवोदित कवी ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम, सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना ‘एठन’ काव्यसंग्रहासाठी द्वितीय व सांगलीच्या सुनीता बोर्डे-खडसे यांना तृतीय क्रमांकाचा विशाखा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी किशोर पाठक म्हणाले, कवीने एकट्याने नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाइलमुळे माणूस अस्वस्थ झाला असला तरी मराठी माणसाने सोशल माध्यमांचा मराठीच्या विकासासाठी वापर करण्याचे आवाहनही किशोर पाठक यांनी यावेळी केले. यावेळी ई. वायुनंदन यांनी प्रत्येकाला मातृभाषेविषयी प्रेम व जिव्हाळा वाटत असला तरी मराठीतील गोडवा सर्वांनाच आकर्षित करणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिनेश भोंडे यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर आणि आभार विजया पाटील यांनी मानले.बेदखल शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्तमहानगरच्या संवेदना आपल्या कवितांतून समाजातून मांडल्या. बेदखल झालेल्या शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्त केले. आज मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार मिळत असल्याने विशाखाशी नाते जोडले गेल्याचे मनोगत यावेळी विशाखा पुरस्काराचे प्रथम मानकरी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मानवैदू या अतिशय मागासलेल्या, दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मान मुक्त विद्यापीठाने केला आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. विद्यापीठाने केलेल्या सन्मानाने मला समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवता येतील, अशा भावना रुक्मिणी पुरस्कार विजेत्या दुर्गा गुडिलू यांनी व्यक्त केल्या.