शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:52 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे.

ठळक मुद्देसुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्कार

नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे. त्यामुळे मराठी माणसानेही मराठीच्या वैभवाचेच गुणगान करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे गंगापूररोड परिसरातील एका मंगल कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात विद्यापीठाच्या वतीने नाशिकच्या सुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा तर मुंबई येथील दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नवोदित कवी ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम, सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना ‘एठन’ काव्यसंग्रहासाठी द्वितीय व सांगलीच्या सुनीता बोर्डे-खडसे यांना तृतीय क्रमांकाचा विशाखा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी किशोर पाठक म्हणाले, कवीने एकट्याने नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाइलमुळे माणूस अस्वस्थ झाला असला तरी मराठी माणसाने सोशल माध्यमांचा मराठीच्या विकासासाठी वापर करण्याचे आवाहनही किशोर पाठक यांनी यावेळी केले. यावेळी ई. वायुनंदन यांनी प्रत्येकाला मातृभाषेविषयी प्रेम व जिव्हाळा वाटत असला तरी मराठीतील गोडवा सर्वांनाच आकर्षित करणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिनेश भोंडे यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर आणि आभार विजया पाटील यांनी मानले.बेदखल शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्तमहानगरच्या संवेदना आपल्या कवितांतून समाजातून मांडल्या. बेदखल झालेल्या शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्त केले. आज मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार मिळत असल्याने विशाखाशी नाते जोडले गेल्याचे मनोगत यावेळी विशाखा पुरस्काराचे प्रथम मानकरी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मानवैदू या अतिशय मागासलेल्या, दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मान मुक्त विद्यापीठाने केला आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. विद्यापीठाने केलेल्या सन्मानाने मला समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवता येतील, अशा भावना रुक्मिणी पुरस्कार विजेत्या दुर्गा गुडिलू यांनी व्यक्त केल्या.