शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी पेटून उठा

By admin | Updated: November 29, 2015 23:09 IST

नितेश राणे : एल्गार मेळाव्यात आवाहन

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा खोटा, अपमानकारक इतिहास लिहूनही महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरोखरच मानसिकता आहे का? विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखालील आरक्षण समितीत केवळ बैठकांचा फार्स सुरू आहे़ त्यामुळे आता आरक्षण मागणार नाही, तर ते मिळविणारच अशी गर्जना करून आरक्षणासाठी पेटून उठा, असे आवाहन ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केले़ यावेळी आरक्षणास विरोध करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, विनायक मेटे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली़ मराठा एकीकरण समितीच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, मराठा समाज आग असून, तो शांत झाल्याने ही आग पुन्हा पेटविण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ही आग पेटविण्यासाठीच बाहेर पडलो आहे. अर्ज, विनंत्या, समित्यांच्या बैठका आता खूप झाल्या आहेत़ त्यामुळे आरक्षण मागणार नाही, ते मिळविणारच, अशी गर्जना राणेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्र माचा, इतिहासाचा मराठ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांसह महापुरुषांचा चुकीचा इतिहास मांडूनही राज्य सरकार बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करते आणि तरीही आम्ही पेटून उठत नाही़ कुठे गेले आपले शौर्य? कुठे गेली मराठ्यांच्या रक्तातली आग? विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला विनोद तावडे, विनायक मेटे यांच्यासारखे मराठा नेते हजर राहतात़ तावडेंमध्ये हिंमत असेल तर नारायण राणेंसारखे आरक्षण देऊन दाखवा़माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले की, आरक्षणासाठी इतर समाजाच्या नेत्यांचे उंबरे झिजविण्यापेक्षा मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याची आवश्यकता आहे़ मी सर्वप्रथम मराठा त्यानंतर पक्ष़ यापूर्वीही असे अनेक पक्ष मी सोडले आहेत. समाजासाठी पक्षाच्या विरोधात उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संदीप कोतवाल यांनी परिषदेचा उद्देश सांगून आरक्षणासाठी सर्व मराठा संघटना पहिल्यांदाच एकत्रित आल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र कोंढरे, माजी खासदार माधवराव पाटील, शिवाजी शेलार, संतोष पाटील, नगरसेवक वत्सला खैरे, विक्र म कदम आदिंसह मराठा समाजातील सुमारे ३० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़(प्रतिनिधी)राज्य सरकारवर टीकाराज्यात भाजपा, शिवसेनेचे सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांना, बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा ३३ टक्के, बहुजन समाज ७० टक्के असूनही तीन टक्के लोकसंख्या असणारे लोक राज्य करत आहेत. राज्यकर्त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही त्यामुळे ते मिळणारच नाही़ त्यामुळे मराठा समाजाला स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी पेटून उठावे लागेल, तेव्हा पेटून उठा, आरक्षणाच्या लढ्यात साथ द्या, आता आरक्षण मागायचे नाही, तर ते मिळवायचेच अशी गर्जनाही नितेश राणे यांनी यावेळी केली.