शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

मराठा आरक्षणासाठी पेटून उठा

By admin | Updated: November 29, 2015 23:09 IST

नितेश राणे : एल्गार मेळाव्यात आवाहन

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा खोटा, अपमानकारक इतिहास लिहूनही महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरोखरच मानसिकता आहे का? विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखालील आरक्षण समितीत केवळ बैठकांचा फार्स सुरू आहे़ त्यामुळे आता आरक्षण मागणार नाही, तर ते मिळविणारच अशी गर्जना करून आरक्षणासाठी पेटून उठा, असे आवाहन ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केले़ यावेळी आरक्षणास विरोध करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, विनायक मेटे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली़ मराठा एकीकरण समितीच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, मराठा समाज आग असून, तो शांत झाल्याने ही आग पुन्हा पेटविण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ही आग पेटविण्यासाठीच बाहेर पडलो आहे. अर्ज, विनंत्या, समित्यांच्या बैठका आता खूप झाल्या आहेत़ त्यामुळे आरक्षण मागणार नाही, ते मिळविणारच, अशी गर्जना राणेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्र माचा, इतिहासाचा मराठ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांसह महापुरुषांचा चुकीचा इतिहास मांडूनही राज्य सरकार बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करते आणि तरीही आम्ही पेटून उठत नाही़ कुठे गेले आपले शौर्य? कुठे गेली मराठ्यांच्या रक्तातली आग? विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला विनोद तावडे, विनायक मेटे यांच्यासारखे मराठा नेते हजर राहतात़ तावडेंमध्ये हिंमत असेल तर नारायण राणेंसारखे आरक्षण देऊन दाखवा़माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले की, आरक्षणासाठी इतर समाजाच्या नेत्यांचे उंबरे झिजविण्यापेक्षा मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याची आवश्यकता आहे़ मी सर्वप्रथम मराठा त्यानंतर पक्ष़ यापूर्वीही असे अनेक पक्ष मी सोडले आहेत. समाजासाठी पक्षाच्या विरोधात उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संदीप कोतवाल यांनी परिषदेचा उद्देश सांगून आरक्षणासाठी सर्व मराठा संघटना पहिल्यांदाच एकत्रित आल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र कोंढरे, माजी खासदार माधवराव पाटील, शिवाजी शेलार, संतोष पाटील, नगरसेवक वत्सला खैरे, विक्र म कदम आदिंसह मराठा समाजातील सुमारे ३० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़(प्रतिनिधी)राज्य सरकारवर टीकाराज्यात भाजपा, शिवसेनेचे सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांना, बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा ३३ टक्के, बहुजन समाज ७० टक्के असूनही तीन टक्के लोकसंख्या असणारे लोक राज्य करत आहेत. राज्यकर्त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही त्यामुळे ते मिळणारच नाही़ त्यामुळे मराठा समाजाला स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी पेटून उठावे लागेल, तेव्हा पेटून उठा, आरक्षणाच्या लढ्यात साथ द्या, आता आरक्षण मागायचे नाही, तर ते मिळवायचेच अशी गर्जनाही नितेश राणे यांनी यावेळी केली.