शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

अन्नसुरक्षा योजनेपासून अनेकजण वंचित

By admin | Updated: October 28, 2015 23:02 IST

नांदूरशिंगोटे : यादीत नाव न आल्याने दीड वर्षापासून धान्य मिळत नसल्याची तक्रार

नांदूरशिंगोटे : पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दीड वर्षापासून अनेक लाभार्थींची नावे अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट होत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्यासोबतच रॉकेलही मिळत नसल्याने पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दीड वर्षापासून रखडलेले यादीचे काम पूर्ण करून सणासुदीला तरी लाभार्थींना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी उपसरपंच ज्योती वाघचौरे यांच्यासह केशरी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे. येथे सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुकान क्रमांक ६१ मार्फत स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. येथे ९५३ केशरी, ८६ बीपीएल, तर १३२ अंत्योदय कार्डधारक आहेत. गतवर्षी फेबु्रवारी २०१४ मध्ये राज्यात अन्नसुरक्षा योजना लागू झाली. अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने निवडल्याने अनेक पात्र लाभार्थींना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अन्नसुरक्षा योजना सुरू होण्याआधी सर्व केशरी कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळत होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून ग्रामीण भागात ७६.३२ इष्टांक गृहीत धरून ग्राहकांना लाभ द्यायचा होता. तथापि, येथील लाभधारकांच्या याद्या बनविताना इष्टांक गृहीत धरला नसल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या. १५ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामसभेचा ठरावही पुरवठा विभागाला दिला आहे. मात्र पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात येथे झालेल्या महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या विस्तारित समाधान दिनाच्या बैठकीतही याबाबतची तक्रार करण्यात आली. तथापि, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या दीड वर्षापासून केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित आहेत. सध्या एक हजार कार्डधारकांपैकी ५५० ते ६०० लोकांना लाभ मिळत आहेत. तीच परिस्थिती केरोसिनची आहे. पुरवठा विभागाकडून केशरी कार्ड दिले जाते; परंतु सदरच्या कार्डावर ग्रामीण भागातील नागरिकांना कोणताच लाभ मिळत नाही. केरोसिनचा पुरवठा कमी असल्याच्या कारणास्तव ते ग्राहकांना दिले जात नाही. दीड वर्षापासून कार्ड काढलेल्या लाभधारकांना केरोसिन नाही. त्यामुळे नांदूरशिंगोटे येथील केशरी कार्डधारकांना पुरेसा धान्य पुरवठा व केरोसिन मिळत नाही.ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांचे रॉकेल वितरण बंद करण्यात आले आहे. काही ग्रामस्थांनी दीड वर्षापूर्वीच केशरी कार्ड काढले त्यांना अगोदरच रॉकेल मिळत नव्हते. ज्यांना मिळत होते त्यांचेही रॉकेल बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन शिधापत्रिका दिल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यांत रेशन व रॉकेल सुरू होईल असे पुरवठा विभागाने सांगितले होते. तथापि, प्रत्यक्षात दीड वर्षापासून दोन्हीही गोष्टी ग्राहकांना मिळत नाहीत. याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून येथील दिवाळी सणाच्या अगोदर केशरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी ज्योती वाघचौरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)