शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी अनेकांनी बदलला पारंपरिक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:54 IST

येवला : कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.

येवला : (योगेंद्र वाघ)  कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू झाली, त्यापाठोपाठ जिल्हाबंदी, गावबंदी. लॉकडाऊनमुळे जनजीवनच ठप्प झाले. बाजारपेठा ठप्प झाल्या, उद्योग-व्यवसाय बंद पडले. सर्वच जण घरात अडकडून पडले. अनेकजण बेरोजगार झाले. तीन महिन्यात स्वत:जवळील जमापुंजीही संपल्यानंतर अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे अनेकांनी पोटासाठी आपले पारंपरिक व्यवसाय सोडून दोन पैसे मिळवून देणारे लॉकडाऊन, संचारबंदी काळात चालणारे व्यवसाय सुरू केल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे.येवल्यात फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या अजय शेख या तरुणाने फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अजय बारा ते तेरा वर्षांपासून तालुक्यात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. लग्नसराईत चार-पाच महिने फोटोग्राफी करायची व त्यातून मिळणाºया उत्पन्नातून वर्षभर घरप्रपंच चालायचा; परंतु कोरोनामुळे लग्नसराई सुरू होण्याआधीच फोटोग्राफी व्यवसाय लॉकझाला.वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फिरले. यामुळे कुटुंब चालवायचे कसे, प्रपंच सांभाळायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून अजयने रस्त्यावर फळ विक्र ी सुरू केली. अजयसारखेच काही फोटोग्राफर व्यवसायिकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. योगेश भावसार हा तरुण बस स्टॅण्डवर पेपर विक्र ी करायचा. लॉकडाऊनमुळे बससेवा बंद झाली त्यामुळे प्रवासीही नाही.परिणामी योगेशने शहरात सायकलवर मटकी विक्र ीचा व्यवसाय सुरू केला.काही सायकलवर खारी-टोस्ट विकतात, तर काही शेंगदाणे-गुडदाणी विकत आहेत.पैठणी विणकर कारागीर वाल्मीक सासे यांच्या घरात दोन हातमाग आहेत. पैठणी उत्पादनातून ते आपले कुटुंब चालवतात. परंतु कोरोनाने ऐन लग्नसराईत बाजारपेठा ठप्प झाल्या. परिणामी व्यवसाय बंद पडला. कुटुंब चालवण्यासाठी त्यााने भाजीपाला विक्र ी व्यवसाय सुरू केला.--------------------शेतमालास दर नसल्याने शेतकरी हैराणकोरोना संसर्गाने शेती व्यवसायही प्रभावित झाला आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने शेतीमाल कवडीमोल किमतीत विकावा लागला तर अनेकांना फेकून द्यावा लागला. आधीच अडचणीत असलेला शेतकरी कोरोनाने आणखीनच अडचणीच्या खाईत लोटला गेला आहे.------------कर्ज फेडण्याचे आव्हानअनेक व्यवसायिकांनी बँका, पतसंस्था, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या भीतीने ग्राहक दुकानापर्यंत येत नसल्याने व्यवसाय सुरू करूनही पैसे मिळतील याची शाश्वती नसल्याने व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.