शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

मानूरच्या कन्येने शेतात फुलवला हिरवागार मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

कळवण : सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना मेहनतीची जोड देत तीस एकर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे आणि ...

कळवण : सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना मेहनतीची जोड देत तीस एकर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे आणि शेतीपिकांचे उत्पादन यशस्वीरित्या घेत कळवण तालुक्यातील मानूर येथील श्रीलेखा पाटील यांनी आपल्या कल्पकतेतून शेती फुलविली आहे. पारंपरिक शेतीसोबतच शेतात वेगळे प्रयोग राबवित शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे.

मानूर येथील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कन्या असलेल्या श्रीलेखा पाटील यांनी आपल्या मानूर शिवारातील शेतीत उत्कृष्ट नियोजन करीत वेगवेगळी पिके घेतली असून एक महिला आपल्या अचाट बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या बळावर उत्तमप्रकारे नियोजन करून शेती विकसित करू शकते याचे उदाहरण पाटील यांनी दाखवून दिले आहे. पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात केशर आंब्याची रोपे लावली असून चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने आंबा मोठ्या प्रमाणात बहरला आहे. त्यांनी खपली गव्हाचा प्रयोगही शेतात केला असून ह्या गव्हाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात घेतले जाते. खपली गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे तो काढणीनंतरही टणक अशा टरफलात असतो. बियाणे म्हणूनही तो टरफलासहीत वापरला जातो. काही क्षेत्रात आद्रक लागवड करण्यात आली असून आल्याचेही उत्पादन घेतले जात आहे. तर केळी लागवडीचाही प्रयोग पाटील यांनी केला असून तो यशस्वी झाला आहे.

इन्फो

दोन हजारांहून अधिक झाडे

श्रीलेखा पाटील यांनी आपल्या शेताच्या बांधावर, कडेला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध झाडांची लागवड केली असून हिरव्यागार झाडीने हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाला आहे. श्रीलेखा पाटील यांचा कृषी क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न राहिला असून सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पाटील या सोलापूर जिल्ह्यातील श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी आहेत. श्रीलेखा पाटील ह्या संस्थेच्या सचिव असून माळशिरस तालुक्यातील पाणिवच्या सरपंचदेखील आहेत.

कोट....

वडील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून आम्ही शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविले असून केशर आंबा, पेरू, केळी अशा फळांसोबतच खपली गहू, आद्रक या पिकांचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नाविन्यता जोपासली, त्याचा निश्चित फायदा होईल.

- श्रीलेखा पाटील, मानूर

फाेटो- ०५ श्रीलेखा पाटील मानूर

===Photopath===

050621\05nsk_6_05062021_13.jpg

===Caption===

फाेटो- ०५ श्रीलेखा पाटील मानूर