शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडकरांना आता महिन्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा ...

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाडकर पुरते हैराण झाले आहेत. यावर्षी मनमाडसह परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. सध्या शहरात तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असल्याने वागदर्डी धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने त्याचाही काहीसा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रांना कमी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनामार्फत तरंग विद्युत मोटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता शहराला १२ दिवसांऐवजी चौदा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ३० जून रोजी मिळणार असल्याने त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात होण्याची शक्यता आहे.

इन्फो

आवर्तनाची प्रतीक्षा

पालिकेतर्फे शिवाजीनगर, शिवाजी चौक, कॉलेज भाग, चंदनवाडी, मुरलीधरनगर, कॅम्प भाग अशा सहा ठिकाणी असलेल्या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठा खंडित तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असते. या महिन्यात मिळणारे पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास उन्हाळा पार होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो- २९ मनमाड वागदर्डी

===Photopath===

290521\29nsk_29_29052021_13.jpg

===Caption===

फोटो- २९ मनमाड वागदर्डी