शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

By admin | Updated: September 19, 2014 00:44 IST

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

नाशिक : नोव्हेंबर २०१३ मध्ये घोटी येथे झालेल्या मंगला एक्स्प्रेस अपघाताचा अहवाल तब्बल दहा महिन्यांनी प्राप्त झाला आहे. अहवालात रेल्वेरुळाला तडा गेल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे; परंतु यास जबाबदार कोण आणि तडा गेल्याबाबतची आगाऊ सूचना देऊनही दुर्लक्ष केल्या प्रकरणाचा ठपका कुणावरही ठेवण्यात आला नसल्याने चौकशीतील महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. १५ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी घोटी येथे मुंबईकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस रुळावरून घसल्याने मोठा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चेतन बक्षी यांची नेमणूक करण्यात आली होती. बक्षी यांनी नाशिकमध्ये दोन दिवस आणि मनमाड येथेही दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करून जबाब नोंदविले होते. चौकशीसाठी नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना समोर येण्याचे जाहीर आवाहनही करण्यात आले होते. असे असतानाही अहवाल हा अपेक्षित नसल्याचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. रेल्वे रुळावरून गाडी घसरल्याने दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असले, तरी रेल्वेरुळाचे ज्याप्रमाणे तुकडे तुकडे झाले त्यावरून या ठिकाणचे रेल्वेरूळ सरकलेले असावेत किंवा त्यांना तडे गेलेले असावेत, असा अनेकांनी जबाब दिलेला होता. विशेष म्हणजे, सदर रेल्वेरुळाची डागडुजी करावी लागेल, असे घटनेपूर्वी दोन महिने अगोदरच येथील गॅँगमनने घोटीचे स्टेशनमास्तर गोगई यांना कळविल्याचे समोर आले होते; मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले न गेल्याने या प्रकरणात मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा तेव्हाच सुरू होती. घटनेपूर्वी काही दिवस अगोदरच या मार्गावरील मालगाडी थांबविण्यात आली होतीे. रेल्वेरूळ सुस्थितीत नसल्याने किंवा रूळ वाकलेल्या अवस्थेत असल्याने मालगाडी थांबल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. असे असतानाही चौकशीत या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या काही दिवस अगोदरच जर रुळामधील दोषामुळे गाडी थांबवावी लागली असेल, तर तेव्हाच त्यावर उपाययोजना का करण्यात आली नाही याची नोंद अहवालात नसल्याने आणि त्याविषयी भाष्य नसल्याने काही अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अर्थात, अहवाल पूर्णपणे प्राप्त झालेला नसला, तरी नेहमीप्रमाणेच अहवालात कुणावरही ठपका ठेवण्यात आला नसावा, असे रेल्वेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अपघाताची चौकशी आणि अहवाल केवळ शासकीय सोपस्कार असल्याचेही खासगीत बोलले जात आहे. (प्रतिनिधी)