शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराविना मनोमीलनाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेषत: या मेळाव्यात अन्य पक्षातील काहींचे ‘इनकमिंग’ होण्याची चर्चा होती. त्यासंदर्भाने उत्तर महाराष्टÑातील मातब्बर राजकीय घराणे संपर्कात असल्याचे भाजपाकडून बोलले जात होते. कॉँग्रेस व राष्टÑवादीतून तिकीट न मिळालेल्यांची नावे त्यासाठी घेतली जात होती. पण तसेही काही न झाल्याने हा मेळावा उपचार ठरल्याची चर्चा खुद्द ‘युती’तच होऊ लागली आहे.युतीच्या उमेदवारांचा एकप्रकारे प्रचाराचा नारळ एकत्र फोडण्याचा संदेश या मनोमीलन मेळाव्याद्वारे देण्यात आल्याने उत्तर महाराष्टÑातील झाडून सारे मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली. एवढेच नव्हे तर सेना वा भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून नुकतेच पक्षांतर केलेल्या व काही पक्षांतराच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांनीदेखील या मेळाव्यात आवर्जून हजेरी लावली. त्यांच्या हजेरीमुळे विद्यमान खासदारांना धडकी भरणे साहजिकच होते. विद्यमान खासदारांनी यापूर्वीच आपापल्यापरीने पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना त्यात अन्य इच्छुकांची भर पडल्यामुळे दोन्ही पक्षात राजी-नाराजीचे वातावरण असून, अशा परिस्थितीत युतीने मनोमीलनासाठी महामेळाव्याचे आयोजन केल्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती. तशी आशा बाळगूनच उत्तर महाराष्टÑाच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. परंतु ‘सेनेची जागा सेना लढवेल, भाजपाच्या जागेवर भाजपा’ एवढेच जाहीर करण्यात आल्यामुळे युतीच्या जागा वाटपात फेरबदल होणार नाही असे स्पष्ट झाले. शिवाय विरोधकांकडे उमेदवार नाहीत, अशी टीका एकीकडे करीत असताना मग स्वपक्षाकडे उमेदवारीसाठी जर इच्छुक मोठ्या प्रमाणात असतील तर युतीने मेळाव्यातच उमेदवार का जाहीर केले नाहीत, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.... तर मनातील जळमटे दूर झाली असतीया मेळाव्यात विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होण्याची व्यक्त होणारी शक्यताही फोल ठरली असून, जर दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर करून मनोमीलन मेळावा घेतला असता तर एकमेकांच्या मनातील जळमटे दूर झाली असती, असेही आता बोलले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा