शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

उमेदवाराविना मनोमीलनाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:47 IST

लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये गेल्या साडेचार वर्षांतील दुरावा दूर करण्यासाठी नाशकात युतीचा मनोमीलन मेळावा झाला असला तरी, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक तयार होऊन ते मेळाव्यातच एकमेकांचे पत्ते कापण्याचे डावपेच आखण्यात मग्न असताना अशा वातावरणात खरोखर मनोमीलन झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेषत: या मेळाव्यात अन्य पक्षातील काहींचे ‘इनकमिंग’ होण्याची चर्चा होती. त्यासंदर्भाने उत्तर महाराष्टÑातील मातब्बर राजकीय घराणे संपर्कात असल्याचे भाजपाकडून बोलले जात होते. कॉँग्रेस व राष्टÑवादीतून तिकीट न मिळालेल्यांची नावे त्यासाठी घेतली जात होती. पण तसेही काही न झाल्याने हा मेळावा उपचार ठरल्याची चर्चा खुद्द ‘युती’तच होऊ लागली आहे.युतीच्या उमेदवारांचा एकप्रकारे प्रचाराचा नारळ एकत्र फोडण्याचा संदेश या मनोमीलन मेळाव्याद्वारे देण्यात आल्याने उत्तर महाराष्टÑातील झाडून सारे मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली. एवढेच नव्हे तर सेना वा भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून नुकतेच पक्षांतर केलेल्या व काही पक्षांतराच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांनीदेखील या मेळाव्यात आवर्जून हजेरी लावली. त्यांच्या हजेरीमुळे विद्यमान खासदारांना धडकी भरणे साहजिकच होते. विद्यमान खासदारांनी यापूर्वीच आपापल्यापरीने पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना त्यात अन्य इच्छुकांची भर पडल्यामुळे दोन्ही पक्षात राजी-नाराजीचे वातावरण असून, अशा परिस्थितीत युतीने मनोमीलनासाठी महामेळाव्याचे आयोजन केल्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती. तशी आशा बाळगूनच उत्तर महाराष्टÑाच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. परंतु ‘सेनेची जागा सेना लढवेल, भाजपाच्या जागेवर भाजपा’ एवढेच जाहीर करण्यात आल्यामुळे युतीच्या जागा वाटपात फेरबदल होणार नाही असे स्पष्ट झाले. शिवाय विरोधकांकडे उमेदवार नाहीत, अशी टीका एकीकडे करीत असताना मग स्वपक्षाकडे उमेदवारीसाठी जर इच्छुक मोठ्या प्रमाणात असतील तर युतीने मेळाव्यातच उमेदवार का जाहीर केले नाहीत, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.... तर मनातील जळमटे दूर झाली असतीया मेळाव्यात विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होण्याची व्यक्त होणारी शक्यताही फोल ठरली असून, जर दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर करून मनोमीलन मेळावा घेतला असता तर एकमेकांच्या मनातील जळमटे दूर झाली असती, असेही आता बोलले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा