शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण दोन महिन्यांच्या तुलनेत समाधानकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सध्या समाधानकारक असले तरी पुढच्या वेळेस तालुका कुपोषणमुक्त होणे गरजेचे आहे. कुपोषण कमी नव्हे तालुक्यातून हद्दपार होण्यासाठी आयसीडीसी विभागाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देपुरेसा आहार मिळत नसल्याने काही उपजत मृत्यू तर काहींचे बालमृत्यू

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सध्या समाधानकारक असले तरी पुढच्या वेळेस तालुका कुपोषणमुक्त होणे गरजेचे आहे. कुपोषण कमी नव्हे तालुक्यातून हद्दपार होण्यासाठी आयसीडीसी विभागाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी कुपोषणाचे प्रमाण अतितीव्र - ९४, तीव्र - ४४९ दि. १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत तर नुकत्याच घेतलेल्या दि. ८ डिसेंबर २०२० नुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतितीव्र - ५७ तर तीव्र - २२७ कुपोषित आढळले.म्हणजेच दोनच महिन्यात चांगला फरक पडल्याने त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण विभागाचे काम समाधान व्यक्त केले. यात हरसूल प्रकल्पाची त्र्यंबक प्रकल्पापेक्षा अगदी नगण्य आकडेवारी वाढलेली दिसते; पण हीच आकडेवारी मागच्या तुलनेत कमी झालेली आहे.याशिवाय हरसूलच्या पलीकडील भाग आदिवासी दुर्गम व गुजरातच्या मागास सीमेवरील व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या मागास सीमेवर असल्याने अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा जुन्या रुढीला चिकटलेल्या लोकांत आयटीडीसीचे प्रबोधन नाही म्हटले तरी कमी पडते. लवकर विवाह, अंधश्रद्धेमुळे या भागात बुवा, भगत, करणी, तोडगे यांचे प्रमाण जास्त आहे. लवकर विवाहामुळे १४-१५ वर्षात संतती! बाळाचे वजन कमी, स्वच्छतेचा अभाव यामुळे अल्पवयीन असलेल्या स्तनदा मातांना स्वतःलाच पुरेसा आहार मिळत नसल्याने काही उपजत मृत्यू तर काहींचे बालमृत्यू घडतात.महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत विविध कल्याणकारी योजना कमी पडल्यास पेसा अंतर्गत हव्या त्या वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. पूरक पोषण आहार अमृत आहार आदींनी गरोदर मातांना दिवस गेल्यापासून म्हणजे तीन महिन्यांपासून बाळ सहा वर्षांचा होईपर्यंत पोषण आहार मिळतो.त्र्यंबकेश्वर प्रकल्पामध्येदेखील कुपोषण एकदम नष्ट झालेले नाही. ही बाबही चिंताजनकच म्हणावी. येथेही यंत्रणा कमी पडते. अंगणवाड्यांसाठी, गरोदर मातांसाठी, स्तनदा मातांसाठी, पोषण आहार, शिधा, अमृत आहार शिधा आदी कोणत्याच बाबींची कमतरता नसताना कुपोषण का घडते याबाबतही संशोधन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य