शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

माळमाथा भागात जाणवू लागली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST

---- मंगल कार्यालयातील गजबज झाली कमी मालेगाव : कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर अटी व शर्ती लादल्या जात आहेत. अवघ्या ५० ...

----

मंगल कार्यालयातील गजबज झाली कमी

मालेगाव : कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर अटी व शर्ती लादल्या जात आहेत. अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याचा फटका मंगल कार्यालय चालकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमधडाक्यात होणारी लग्न आता साधेपणाने करावी लागत आहेत. कोरोनामुळे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आली आहे.

----

मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

मालेगाव : शहर परिसरात दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहेत. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या महिनाभरापासून दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक दुचाकी चोरीचे प्रकार छावणी व कॅम्पच्या हद्दीत होत आहेत. पोलिसांपुढे दुचाकी चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

-----

रसवंती, शीतपेयांची दुकाने थाटली

मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. परिणामी ठिकठिकाणी रसवंती व शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक उपरणे, गॉगल, चष्मा, टोपीबरोबरच शीतपेयाचा आधार घेत आहेत. टेहरेफाटा, मोसमपूल, रामसेतू, कॅम्परोडवर रसवंती गृहे सुरू झाली आहेत.

-----

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा

मालेगाव : शहरालगतच्या गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. टेहरे फाट्याजवळील गिरणा पुलाजवळ बैलगाडींद्वारे वाळूची चोरी होत आहे. पुलाजवळ मोठमाेठे खड्डे पडले आहेत. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

----

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. रब्बी पीक हाता - तोंडाशी आले असताना महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.

-----

पंचायत समितीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार

मालेगाव : मालेगाव पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात तसेच इवद विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरूड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक व उपअभियंत्यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी गरूड यांनी केली आहे.

-----

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक

मालेगाव : जाफरनगर भागातील रूबिना अली या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पती साेहराब मोहंमद शरीफ, अहमद सोहराब अली, सिराजअली, सोहेलअली या चौघांना आयेशानगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मोहंमद युसूफ मोहंमद हारूण यांनी फिर्याद दिली होती. रूबिनाच्या नावावर असलेला प्लॉट तिचा सावत्र मुलगा अहमद याच्या नावावर करून देण्यासाठी छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने ॲसिड पिवून आत्महत्या केली होती.