शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

माळमाथा भागात जाणवू लागली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST

---- मंगल कार्यालयातील गजबज झाली कमी मालेगाव : कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर अटी व शर्ती लादल्या जात आहेत. अवघ्या ५० ...

----

मंगल कार्यालयातील गजबज झाली कमी

मालेगाव : कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर अटी व शर्ती लादल्या जात आहेत. अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याचा फटका मंगल कार्यालय चालकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमधडाक्यात होणारी लग्न आता साधेपणाने करावी लागत आहेत. कोरोनामुळे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आली आहे.

----

मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

मालेगाव : शहर परिसरात दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहेत. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या महिनाभरापासून दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक दुचाकी चोरीचे प्रकार छावणी व कॅम्पच्या हद्दीत होत आहेत. पोलिसांपुढे दुचाकी चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

-----

रसवंती, शीतपेयांची दुकाने थाटली

मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. परिणामी ठिकठिकाणी रसवंती व शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक उपरणे, गॉगल, चष्मा, टोपीबरोबरच शीतपेयाचा आधार घेत आहेत. टेहरेफाटा, मोसमपूल, रामसेतू, कॅम्परोडवर रसवंती गृहे सुरू झाली आहेत.

-----

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा

मालेगाव : शहरालगतच्या गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. टेहरे फाट्याजवळील गिरणा पुलाजवळ बैलगाडींद्वारे वाळूची चोरी होत आहे. पुलाजवळ मोठमाेठे खड्डे पडले आहेत. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

----

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. रब्बी पीक हाता - तोंडाशी आले असताना महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.

-----

पंचायत समितीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार

मालेगाव : मालेगाव पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात तसेच इवद विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरूड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक व उपअभियंत्यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी गरूड यांनी केली आहे.

-----

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक

मालेगाव : जाफरनगर भागातील रूबिना अली या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पती साेहराब मोहंमद शरीफ, अहमद सोहराब अली, सिराजअली, सोहेलअली या चौघांना आयेशानगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मोहंमद युसूफ मोहंमद हारूण यांनी फिर्याद दिली होती. रूबिनाच्या नावावर असलेला प्लॉट तिचा सावत्र मुलगा अहमद याच्या नावावर करून देण्यासाठी छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने ॲसिड पिवून आत्महत्या केली होती.