शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माळी समाजाची राजकीय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:34 IST

फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नाशिक : फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.नाशिक जिल्हा माळी समाज नियोजन समितीतर्फे एक दिवस समाजासाठी, एक दिवस भविष्यासाठी एक दिवस अस्तित्वासाठी ही त्रिसूत्रीसमोर ठेवून द्वारका परिसरातील माळी मंगल कार्यालयात माळी समाज चिंतन आणि स्नेहमेळाव्यात ते रविवारी (दि. २९) बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सुनील मोरे, बाजीराव तिडके, अविनाश ठाकरे, दीपक मंडलिक, सुनीता गिते, अनिल जाधव, चंद्रकांत बागुल, अविनाश ठाकरे, आदी उपस्थित होते. संभाजी बोरुडे म्हणाले, संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समृद्ध वारसा माळी समाजास लाभला आहे. समाजात साक्षरतेचा प्रसार करण्यात आणि सामाजिक, राजकीय योगदानात मोलाची भूमिका बजावणाºया माळी समाजात एकजुटीची भावना, वैचारिक प्रगती व्हावी आणि समाज विधायक उपक्र म राबविण्यासाठी आपसातील मतभेद दूर करून समाजाने संघटित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तर सामाजाच्या प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत संभाजी पगारे यांनी व्यक्त केली.  यावेळी चर्चासत्रात सद्यस्थितीला समाज व्यवस्थेमध्ये माळी समाजाचे स्थान, माळी समाजाचे स्वरूप, समाजबांधवांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध वाटा, माळी समाजापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने यांसारख्या विविध महत्त्वाच्या पैलूंसह ‘राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील माळी समाजाचे स्थान आदी विषयांवर समाजबांधवांनी त्यांची मते मांडली. दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले रचित विविध गीतांचा आविष्कारही यावेळी सादर करण्यात आला. यावेळी राज्यभरातून माळी समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मोहन माळी यांनी केले. राका माळी यांनी आभार मानले.छगन भुजबळांची पाठराखणमाळी समाज चिंतन, स्नेहमेळाव्यात माळी समाजाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करीत त्यांच्यावर राजकीय व सामाजिक द्वेशातूनच कारवाई होत असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वीही शहरात माळी समाजाने अनेक बैठका घेऊन भुजबळांना पाठिंबा दिला आहे.