शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

मालेगाव तालुका दुष्काळाच्या दुष्टचक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:57 IST

मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

ठळक मुद्देटंचाई : सात लघुप्रकल्पांपैकी पाच कोरडीठाक; २५ गावे, ८० वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठागेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण घटले

मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.एप्रिल महिना अखेरपर्यंत जनावरांना चारा पुरेल अशी स्थिती आहे. रोजगार हमी योजनेत सुमारे २० हजार मजुरांची नोंदणी झाली असली तरी कामांची मागणी नसल्याने रोजगार हमी योजना तालुक्यात कागदावरच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना निवडणुकीचे वेध लागले आहेत, तर प्रशासन निवडणूक घाईत व्यस्त आहे. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.यंदा खरीप पिकापाठोपाठ रब्बी पिकांनाही दुष्काळी स्थितीचा फटका बसला. माळमाथा व काटवन भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा व पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. चारा व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकावे लागत आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यासाठी १०६ टँकरच्या फेऱ्या मंजूर आहेत. त्यापैकी १०० फेऱ्या मारून पाणीपुरवठा केला जात आहे. येथील पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात सुमारे २० हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र विहीर खोदकाम वगळता इतर कामांची मागणी न झाल्यामुळे नोंदणीकृत मजुरांनाच काम उपलब्ध करून देण्यास येथील पंचायत समिती प्रशासनात उदासीनता दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हातांना काम नाही अशी परिस्थिती असताना गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक दुष्काळी उपाययोजना चालविण्यास असमर्थ ठरत आहेत. तालुक्यात २८ हजार ८५२ लहान जनावरे, तर एक लाख २१ हजार ४६८ मोठे जनावरे आहेत. असे एकूण एक लाख ४९ हजार ९२० लहान-मोठे जनावरे आहेत. या जनावरांना लागणाºया चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पशुधन विभागाने राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १४ हजार ७७६ किलो ज्वारीचे बियाणे व ४ हजार १२० किलो मका बियाणे असे एकूण १८ हजार ८९६ किलो चारा बियाणे वाटप केले आहे. तसेच गाळ पेराअंतर्गत ९४ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहेत. या बियाणे वाटपातून ३९ हजार मेट्रिक टन चारा तालुक्याला उपलब्ध होणार असून, सदरचा चारा एप्रिल महिन्यापर्यंत पुरणार असल्याचा दावा पशुधन विभागाकडून करण्यात आला आहे.तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी पाच लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. बोरे अंबेदरी व साकूर लघुप्रकल्पात मृत साठा शिल्लक आहे, तर लुल्ले, दहिकुटे, झाडी, अजंग, दुंधे आदी लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दिवसागणिक दुष्काळाची भयानकता तालुक्यात वाढत चालली आहे. उन्हाचा प्रकोपही वाढला आहे. दुष्काळ व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त होते, तर आता प्रचार करण्यात दंग झाले आहेत. पाणीटंचाई व दुष्काळी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.- चंद्रसिंग राजपूत, तहसीलदार, मालेगाव