शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मालेगावकरांना लागले संक्रांतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

वातावरणातील बदलाने नागरिक आजारी मालेगाव: शहर, परिसरात वातावरणातील बदलामुळे वृद्धांसह नागरिक हैराण झाले असून, त्यांना साथीच्या विविध आजारांना सामोरे ...

वातावरणातील बदलाने नागरिक आजारी

मालेगाव: शहर, परिसरात वातावरणातील बदलामुळे वृद्धांसह नागरिक हैराण झाले असून, त्यांना साथीच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. थंडीचा कडाका वाढत असताना, अचानक थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे नागरिक साथीच्या आजारांना सामोरे जात आहेत. सर्दी, पडसे अशा विकार वाढत असताना कोरोनाची दहशतही कायम आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची वाढली चुरस

मालेगाव: तालुक्यात ९९पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९६ ग्रामपंचायतीत निवडणुकीची चुरस वाढली आहे. काही ग्रामपंचायतीत उमेदवारच मिळाले नसल्याने, काही जणांना मैदानात पॅनलच उतरविता आले नाही, तर काही ठिकाणी पॅनलमधूनच उमेदवार पळून दुसऱ्या पॅनलला जाऊन मिळाल्याने पॅनल प्रमुखांचे हाल झाले. आता येत्या चार दिवसांत साम, दाम, दंड, भेद नीती वापरून कोण विजयी होते, याकडे गामस्थांचे लक्ष लागले आहे.

सर्वपक्षीय नेते आमनेसामने

मालेगाव: तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व असताना, ग्रामपातळीवर मात्र शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर निवडणुकीला उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी, ग्रामीण भागात पक्षीय भेद न ठेवता, सर्वच पक्षाचे नेते वेगवेगळ्या पॅनलमध्ये दिसत आहेत. राज्यात एकमेकांसमोर विरोधात लढणारे नेते मात्र, स्थानिक पातळीवर एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवित असल्याने ग्रामस्थांची मात्र करमणूक होत आहे.