शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : नोंदणी एक लाख मजुरांची; प्रत्यक्षात कामावर १६ हजार मजूर मजुरांअभावी रोजगार हमी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:09 IST

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जातेरोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र नोंदणीकृत मजुरांपैकी केवळ १६ हजार ३९ मजूरच रोहयोच्या कामावर येत असल्याचे समोर आले आहे.मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामामुळे होणारे स्थलांतर थांबावे, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडली आहे. या योजनेंतर्गत विहिरी, रस्ते, घरकुले, मातीनाला बांध, भूमिगत बंधारा, साठवण बंधारा, वृक्षलागवड, रोपवाटिका, वनतलाव आदी कामे केली जातात. या कामांसाठी येणाऱ्या मजुरांना प्रतिदिन २०१ रुपये वेतन दिले जाते. असे असताना रोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. केवळ कागदावरच मजुरांचा आकडा फुगवला गेला आहे. प्रत्यक्षात कामावर मजूर उपलब्ध होताना दिसत नाहीत. रोहयो योजनेंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये तालुक्यात २७४ विहिरी, २३ रस्ते, साडेतीन हजार घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत मजुरांना ६ कोटी ८१ लाख १३ हजार रुपये मजुरीपोटी वाटप करण्यात आले आहेत, तर विहीर कामापोटी ६७ लाख ९७ हजार रुपयांची मजुरी अदा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेबाबत तालुक्यात मजुरांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामाअभावी होणारे स्थलांतर थांबावे, मजुरांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र मालेगाव तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१८ पासून नवीन रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यानुसार तालुक्यात कामे निश्चित केली जाणार आहेत. मात्र कागदोपत्री मजुरांची संख्या दिसून येते; प्रत्यक्षात मजुरीला मजूरच येत नसल्याचे वास्तव आहे.