शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

मालेगाव : नोंदणी एक लाख मजुरांची; प्रत्यक्षात कामावर १६ हजार मजूर मजुरांअभावी रोजगार हमी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:09 IST

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जातेरोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली

मालेगाव : तालुक्यात शासनाची रोजगार हमी योजना मजुरांअभावी रखडली आहे. सुमारे ५७ हजार ५७२ कुटुंबांतील एक लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र नोंदणीकृत मजुरांपैकी केवळ १६ हजार ३९ मजूरच रोहयोच्या कामावर येत असल्याचे समोर आले आहे.मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामामुळे होणारे स्थलांतर थांबावे, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडली आहे. या योजनेंतर्गत विहिरी, रस्ते, घरकुले, मातीनाला बांध, भूमिगत बंधारा, साठवण बंधारा, वृक्षलागवड, रोपवाटिका, वनतलाव आदी कामे केली जातात. या कामांसाठी येणाऱ्या मजुरांना प्रतिदिन २०१ रुपये वेतन दिले जाते. असे असताना रोहयोच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. केवळ कागदावरच मजुरांचा आकडा फुगवला गेला आहे. प्रत्यक्षात कामावर मजूर उपलब्ध होताना दिसत नाहीत. रोहयो योजनेंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये तालुक्यात २७४ विहिरी, २३ रस्ते, साडेतीन हजार घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत मजुरांना ६ कोटी ८१ लाख १३ हजार रुपये मजुरीपोटी वाटप करण्यात आले आहेत, तर विहीर कामापोटी ६७ लाख ९७ हजार रुपयांची मजुरी अदा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेबाबत तालुक्यात मजुरांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मालेगाव पंचायत समिती व महसूल विभागातर्फे तालुक्यात रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावे, मजुरांचे कामाअभावी होणारे स्थलांतर थांबावे, मजुरांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र मालेगाव तालुक्यात ही योजना मजुरांअभावी रखडल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१८ पासून नवीन रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यानुसार तालुक्यात कामे निश्चित केली जाणार आहेत. मात्र कागदोपत्री मजुरांची संख्या दिसून येते; प्रत्यक्षात मजुरीला मजूरच येत नसल्याचे वास्तव आहे.