शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मालेगावी राजमाता उद्यानाचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून ...

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून उद्यानाला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवते. उद्यान खोल भागात असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येथे साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने या उद्यानाचा शक्यतो डिसेंबर ते जून महिन्यातच नागरिकांना वापर होतो. उद्यानाच्या पूर्व दिशेला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यात शेवाळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. साचलेल्या पाण्यात डास वाढले असून आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंती खचलेल्या आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्याला लागून असलेल्या भिंती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी संकुलात ही पावसाळ्यात बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोटारीच्या साहाय्याने पाणी काढण्यात येते. महानगरपालिकेने उद्यान उभारताना पाऊस पाणी साचण्याची शक्यतेकडे दुर्लक्ष केल्याची नागरिक तक्रार करत आहेत.

-------------------

रस्ता खड्डेमय

साचलेल्या पाण्यातील वस्तू सडून दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांना या समस्येला ही तोंड द्यावे लागत आहे. उद्यानासमोरील रस्ता ही खड्डेमय झाला असून दुरुस्तीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेने या उद्यानाचे काम करताना सर्व शक्यता लक्ष्यात घेऊन जलतरण तलाव करणे अपेक्षित होते, तरी उद्यान करून जनतेचा कररूपी पैसा पूर्णपणे पाण्यात घातल्याचा जनतेतून रोष व्यक्त होत आहे.

-----------------

उपाययोजनेची गरज

शहरातील एकमेव मोठे उद्यान असल्याने शुक्रवारी, शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी अधिक साहित्य, उपकरणे वाढण्याची गरज आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--------------------

खरे म्हणजे येथे जलतरण तलावच व्हायला हवा होता. महानगरपालिकेने सर्वांगीण विचार न करता उद्यान उभारले. आता वर्षातून फक्त सहा महिने वापराचे उद्यान झाले आहे. जनतेचा कररूपी पैसा, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम केले आहे.

-निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव