शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

मालेगावी राजमाता उद्यानाचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून ...

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून उद्यानाला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवते. उद्यान खोल भागात असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येथे साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने या उद्यानाचा शक्यतो डिसेंबर ते जून महिन्यातच नागरिकांना वापर होतो. उद्यानाच्या पूर्व दिशेला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यात शेवाळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. साचलेल्या पाण्यात डास वाढले असून आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंती खचलेल्या आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्याला लागून असलेल्या भिंती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी संकुलात ही पावसाळ्यात बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोटारीच्या साहाय्याने पाणी काढण्यात येते. महानगरपालिकेने उद्यान उभारताना पाऊस पाणी साचण्याची शक्यतेकडे दुर्लक्ष केल्याची नागरिक तक्रार करत आहेत.

-------------------

रस्ता खड्डेमय

साचलेल्या पाण्यातील वस्तू सडून दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांना या समस्येला ही तोंड द्यावे लागत आहे. उद्यानासमोरील रस्ता ही खड्डेमय झाला असून दुरुस्तीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेने या उद्यानाचे काम करताना सर्व शक्यता लक्ष्यात घेऊन जलतरण तलाव करणे अपेक्षित होते, तरी उद्यान करून जनतेचा कररूपी पैसा पूर्णपणे पाण्यात घातल्याचा जनतेतून रोष व्यक्त होत आहे.

-----------------

उपाययोजनेची गरज

शहरातील एकमेव मोठे उद्यान असल्याने शुक्रवारी, शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी अधिक साहित्य, उपकरणे वाढण्याची गरज आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--------------------

खरे म्हणजे येथे जलतरण तलावच व्हायला हवा होता. महानगरपालिकेने सर्वांगीण विचार न करता उद्यान उभारले. आता वर्षातून फक्त सहा महिने वापराचे उद्यान झाले आहे. जनतेचा कररूपी पैसा, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम केले आहे.

-निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव