शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

मालेगावी राजमाता उद्यानाचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून ...

सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून उद्यानाला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवते. उद्यान खोल भागात असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येथे साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने या उद्यानाचा शक्यतो डिसेंबर ते जून महिन्यातच नागरिकांना वापर होतो. उद्यानाच्या पूर्व दिशेला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यात शेवाळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. साचलेल्या पाण्यात डास वाढले असून आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंती खचलेल्या आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्याला लागून असलेल्या भिंती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी संकुलात ही पावसाळ्यात बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोटारीच्या साहाय्याने पाणी काढण्यात येते. महानगरपालिकेने उद्यान उभारताना पाऊस पाणी साचण्याची शक्यतेकडे दुर्लक्ष केल्याची नागरिक तक्रार करत आहेत.

-------------------

रस्ता खड्डेमय

साचलेल्या पाण्यातील वस्तू सडून दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांना या समस्येला ही तोंड द्यावे लागत आहे. उद्यानासमोरील रस्ता ही खड्डेमय झाला असून दुरुस्तीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेने या उद्यानाचे काम करताना सर्व शक्यता लक्ष्यात घेऊन जलतरण तलाव करणे अपेक्षित होते, तरी उद्यान करून जनतेचा कररूपी पैसा पूर्णपणे पाण्यात घातल्याचा जनतेतून रोष व्यक्त होत आहे.

-----------------

उपाययोजनेची गरज

शहरातील एकमेव मोठे उद्यान असल्याने शुक्रवारी, शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी अधिक साहित्य, उपकरणे वाढण्याची गरज आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--------------------

खरे म्हणजे येथे जलतरण तलावच व्हायला हवा होता. महानगरपालिकेने सर्वांगीण विचार न करता उद्यान उभारले. आता वर्षातून फक्त सहा महिने वापराचे उद्यान झाले आहे. जनतेचा कररूपी पैसा, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम केले आहे.

-निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव