शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मालेगावी उष्माघात रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST

शहर परिसरात दरवर्षी एप्रिल महिन्यात कडक ऊन पडत असते. यंदा मार्चमध्येच उन्हाचा प्रकाेप वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस ...

शहर परिसरात दरवर्षी एप्रिल महिन्यात कडक ऊन पडत असते. यंदा मार्चमध्येच उन्हाचा प्रकाेप वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला हाेता. परंतु, वातावरण निवळल्याने सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. मागील आठवड्यात शहराचे तपमान ३८ अंशाच्या आसपास हाेते. मंगळवारी पारा ४२ अंशावर पाेहाेचला. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिणामी आरोग्य विभागाकडून याेग्य ती काळजी घेतली जात आहे. कडक ऊन, उष्माघातासारख्या प्रकाराला निमंत्रण देणारे ठरते. उष्माघाताचा झटका आल्यास वेळीच उपचार मिळणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने सामान्य रुग्णालयात इमर्जन्सी उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे. रुग्णांना बाहेरच्या उष्ण वातावरणाचा त्रास हाेऊ नये म्हणून कुलरसारख्या विशेष उपाययाेजना करण्यात आल्या आहेत.

----------------

भरपूर पाणी प्यावे

नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, सुती व सैल कपडे वापरावे , शरीराचा घाम पुसून काढावा, ताप आल्यास गार पाण्याचे अंग पुसावे, थंड पाणी, शहाळे, फळांचा रस यांचा भरपूर वापर करावा, तहान नसली तरी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे, चहा-काॅफीसारखे उत्तेजक पेय पिणे टाळावे, नशा आणणारे मादक पेय पिऊ नये, उन्हात जाणे टाळावे, पांढरी टाेपी, उपरणे, गाॅगल्स यांचा वापर करावा, ही काळजी घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येईल.

---------------

उष्माघाताची लक्षणे

ताप येणे, थकवा जाणवणे, डाेकेदुखी किंवा चक्कर येणे, हातापायात गाेळे चढणे, जीभ आत ओढली जाणे, त्वचा रुक्ष हाेणे, हृदयाचे ठाेके जलद गतीने पडणे,उलटी हाेणे.

--------------

उन्हामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. नागरिकांनी क्षारांचा समताेल सांभाळणारी पेये जरूर घ्यावी. सध्या काेराेना संकट असल्याने धाेका वाढला आहे. जनतेने उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी.

- डाॅ. किशाेर डांगे, वैद्यकीय अधीक्षक