शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

मालेगाव : भर उन्हात महिलांची पायपीट अजंग परिसरात पाणीटंचाईने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:12 IST

अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्दे पाण्याअभावी परिसरातील नागरिकांना स्थलांतराची भीती पंधराशे फूट खोल केल्याने पाण्याची पातळी खाली

अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. संबंधितांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. अजंग परिसरात शासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याअभावी परिसरातील नागरिकांना स्थलांतराची भीती निर्माण झाली आहे. शासनाने शेती महामंडळाची जमीन मोठमोठ्या कंपनीधारक व बांधकाम व्यावसायिकांना दिल्याने त्यांनी सहा इंची शेकडो कूपनलिका केल्या. सदर कूपनलिका रावळगाव शिवारापासून ते मालेगाव दूध डेअरीपर्यंत केल्या. त्याही एका एकरमध्ये सुमारे दोन ते चार कूपनलिका करून त्या सहा इंची रुंद व एक हजार ते पंधराशे फूट खोल केल्याने पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी तसेच कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणीपुरवठा विभागाच्या विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आलीआहे. शेकडो कूपनलिका केल्याने त्याची झळ थेट मालेगाव दूध डेअरी तसेच भायगाव नववसाहत आदर्शनगरपर्यंत बसली आहे. सदर लोकांनी एक हजार फुटापर्यंत खोल कूपनलिका करताना शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. शासनाच्याच जमिनीवर बेकायदेशीर हजार फूट खोलीच्या कूपनलिका केल्याने त्याची झळ बसली आहे. शासनाने नागरिकांना पाणीसंकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच बेकायदेशीररित्या महामंडळाच्या जमिनीवर खोदलेल्या कूपनलिकाधारकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.