शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मालेगाव : भर उन्हात महिलांची पायपीट अजंग परिसरात पाणीटंचाईने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:12 IST

अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्दे पाण्याअभावी परिसरातील नागरिकांना स्थलांतराची भीती पंधराशे फूट खोल केल्याने पाण्याची पातळी खाली

अजंग : अजंगसह परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. संबंधितांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. अजंग परिसरात शासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याअभावी परिसरातील नागरिकांना स्थलांतराची भीती निर्माण झाली आहे. शासनाने शेती महामंडळाची जमीन मोठमोठ्या कंपनीधारक व बांधकाम व्यावसायिकांना दिल्याने त्यांनी सहा इंची शेकडो कूपनलिका केल्या. सदर कूपनलिका रावळगाव शिवारापासून ते मालेगाव दूध डेअरीपर्यंत केल्या. त्याही एका एकरमध्ये सुमारे दोन ते चार कूपनलिका करून त्या सहा इंची रुंद व एक हजार ते पंधराशे फूट खोल केल्याने पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी तसेच कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणीपुरवठा विभागाच्या विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आलीआहे. शेकडो कूपनलिका केल्याने त्याची झळ थेट मालेगाव दूध डेअरी तसेच भायगाव नववसाहत आदर्शनगरपर्यंत बसली आहे. सदर लोकांनी एक हजार फुटापर्यंत खोल कूपनलिका करताना शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. शासनाच्याच जमिनीवर बेकायदेशीर हजार फूट खोलीच्या कूपनलिका केल्याने त्याची झळ बसली आहे. शासनाने नागरिकांना पाणीसंकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच बेकायदेशीररित्या महामंडळाच्या जमिनीवर खोदलेल्या कूपनलिकाधारकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.