शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मालेगावी शेतकऱ्याची न्यायासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 22:50 IST

मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकांदा मालाचे २० हजार अडकले; सहा महिन्यांपासून व्यापाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.भाऊसाहेब निकम यांनी २५ एप्रिल रोजी झोडगे मार्केटला २७ क्विंटल २० किलो कांदा माल ७५० रुपये भावाने परवानाधारक कांदा व्यापारी किरण वसंतराव पारखे (चांदवड) यांना विकला. आडत, हमाली काढून २० हजार ९१ रुपये एवढे बिल झाले. शेतमाल १० मे रोजी घेताना तसे पावतीवरदेखील लिहून दिले. निकम यांनी विश्वास ठेवत मान्य केले, मात्र त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. तेव्हापासून ते हक्काच्या पैशासाठी या व्यापाऱ्याला सारखा फोन करीत आहेत, मात्र सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत असून, कधी फोन बंद, कधी उचलतच नाही त्यामुळे शेतकरी कंटाळला आहे.मालेगाव मार्केट कमिटीत अर्जफाटे करून झालेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासमोरही फोनद्वारे समस्या मांडली, त्यांनीही व्यापाऱ्याला शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी तंबी दिली, मात्र तीही लागू झाली नाही. निकम हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यासाठी वीस हजार ही खूप मोठी रक्कम आहे. व्यापाऱ्याने दिवाळीत फोनपेद्वारे फक्त पाच हजार दिले.हे चुकते शेतकऱ्यांचेशेतकरी वेळोवेळी व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे काढण्यासाठी मार्केट कमिटीकडे अर्जफाटे करतात, मात्र पोच घेत नाहीत. त्यामुळे कोणी त्यांना बोलू देत नाहीत. शिवाय युनियन नसल्याने शेतकरी एकजूट नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.