शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST

नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

ठळक मुद्देसामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थव्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमकगाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप राजकीय वातावरण ढवळून निघाले

मालेगाव : नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा पडला असला, तरी सामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत.नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा संदेश त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला होता. या ग्रुपवर अद्वय हिरे यांनीही संदेश टाकला होता. यावरून दोघा गटांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमक उडाली. हिरे यांनी गायकवाड समर्थकांना बंगल्यावर येण्याचे आव्हान दिले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून गायकवाड समर्थकांनीच सटाणा नाक्यावर येण्याचे आव्हान दिले. यानंतर हिरे हे त्यांच्या काही समर्थकांना घेऊन गायकवाड यांच्या निवासस्थानाकडे आले असता गायकवाड यांच्या समर्थकांनी गाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. हिरे यांनी सटाणानाका भागात येऊन शिवीगाळ व असभ्य वर्तन केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.या मारहाणीत हिरे जखमी झाले होते. त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. यानंतर हिरे छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. पोलीस अधीक्षकांचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. त्यामुळे हिरे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची नोंद घेतली. बुधवारी दिवसभर राजकीय पदाधिकाºयांनी व आपापसातील सामंजस्यामुळे पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारी मागे घेण्यात आल्या. दरम्यान, या प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.