शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मालेगाव-अजंग रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST

मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्देसंताप । भाजयुमो-राजगड प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे उपोषण

वडनेर : मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली ९ ते १० महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते; मात्र निवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शनिवारपासून (दि.१४) आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात झाले असून, रस्ते अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अपघातात वाहनचालक जखमी होत आहेत; मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग- मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केला आहे. या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अजंग ते मालेगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यामुळे आज बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप युवामोर्चाचे सुनील शेलार यांनी सांगितले.आजपर्यंत मालेगाव-नामपूर रस्त्यावर विविध अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजून किती लोकांचा जीव घेण्याची वाट प्रशासन बघणार आहे असा सवाल राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांनी उपस्थित केला आहे.भारतीय जनता युवा मोर्चाचे सुनील शेलार व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांच्यासह शेखर पगार, रवि कन्नोर, भूषण बागुल, विकी पाटील, योगेश सोनवणे,प्रल्हाद सोनवणे, वसंत अहिरे, जगन्नाथ भदाणे, महेश तावडे, इम्तियाज शेख, विजय देवरे, हिरा बोरसे, योगेश पवार, सावकार शेलार, योगेश अहिरे आदींसह उपोषणकर्ते उपस्थित होते.वाहने खराब झाल्याने प्रवाशांचे हालमालेगाव ते अजंग दरम्यान मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. दररोज रिक्षा व जीप या रस्त्यावरून धावत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांमध्ये बिघाड होत आहे. वाहनांचे स्पेअरपार्ट्स तुटून पडत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असल्याने वाहने कुठून चालवावीत, असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. मोठे वाहन गेले तर रस्त्यावर धुराळा उडत असतो. पाठीमागून चालणाºया दुचाकीस्वारालाही धुळीचा सामना करावा लागतो. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित ठेकेदार रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वेळकाढूपणा करीत आहे.

 

टॅग्स :StrikeसंपTrafficवाहतूक कोंडी