शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे परिसरातील शेतमालांचे मोठे नुकसान

By admin | Updated: May 6, 2014 21:36 IST

डांगसौंदाणे-परिसरात आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

डांगसौंदाणे-परिसरात आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सततच्या होणार्‍या पावसामुळे शेतकरी हवालदील झाला असून उन्हाळ कांदा मिरची, मिरची, टोमॅटो, बाजरीसह डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.१ तास चाललेल्या या पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळी कांदा पूर्णपणे भिजला आहे. तर शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगार्‍याखाली (घोडी) पाणी गेल्याने हा कांदा ही साठवणूक करणे शेतकर्‍यांसाठी जोखमीचे ठरणार आहे.आज डांगसौदाणे आठवडे बाजार असल्याने मजूर वर्ग बाजारात असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कांद्यांच्या घोड्यांवर प्लास्टीक कागद (ताडपत्री) झाकण्यासाठी शेतकर्‍यांना सर्वत्र धावपळ करावी लागली.या पावसामुळे टोमॅटो, मिरची, आदी पिके रोगांना बळी पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे तर काढणी आलेली उन्हाळ बाजरी पुर्णपणे भिजल्याने खराब झाली आहे. तर बहर धरलेल्या डाळींब बागा या पाण्यामुळे बुरशीजन्य आजारांना बळी पडून बागा खराब होण्याची भिती डाळींब उत्पादक शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.गत चार ते पाच दिवसापासून वातावरणात रोजच बदल घडत असतांना आज झालेल्या या पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत अजुनच वाढ झाली आहे.आठवडे बाजाराच्या निमित्ताने आलेल्या बाजारकरुसह, व्यापारी वर्गाची पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. (वार्ताहर)