शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:57 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

गिरणारे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.रस्त्याचे काम अचानक बंद झाल्याने वाहतुकीला व येणाऱ्या जाणाºया नागरिकांच्या दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून चारचाकी वाहने पास झाल्यास टायरखालील दगड उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांवर व तेथील ग्राहकांवर जाऊन दुखापत होण्याचा घटना घडत असून, ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी गिरणारे गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.  नाशिक तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून परिसरातील गावांची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली होती.ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने आमदार निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हे काम ठेकेदाराकडून करून घेतले जाणार आहे. या कामाला ठेकेदाराने  उशिराने का होईना मात्र सुरुवात केली होती, मात्र कामालाकुठेतरी बाधा आली आणि दोन दिवस सुरू असलेले हे काम अचानकपणे बंद झाले. रस्त्याचे काम बंद होऊन साधारण पंधरा दिवस झाले  मात्र अजून कामाची सुरु वात  झाली नसल्याने गावातील  नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय?रस्त्याच्या मधोमध जेसीबीच्या साहाय्याने खणल्याने रस्त्यात मोठा खड्डा तयार होऊन त्याचे बारीक बारीक दगड गाडीच्या टायरखाली येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकानात जाऊन दुखापत व सामानाची नुकसान होऊन रस्त्यावरची धूळ उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेले हे काम त्वरित सुरु कारण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांकडे केली.४या रस्त्यावर येणाºया जाणाºया शाळकरी मुलांना सायकलीवरून येता जाता खडीवरून घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. हे काम चालू करतांना मात्र याठिकाणी बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ठेकेदार नेमके कशे काम करतो याचा अंदाज लावणे कठीणच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.४त्यातल्या त्यात दोन दिवसानंतर हे काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे. याठिकाणी १० गावाचा मिळून दर गुरु वारी आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद