शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

घरगुती सौरऊर्जा घेणार महावितरण

By admin | Updated: January 17, 2016 23:07 IST

नवे धोरण : नाशिकमधील महिलेच्या प्रयत्नांना यश; ग्राहकांना मिळणार लाभ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सौरऊर्जा हा एक उत्तम उपाय आहेच; परंतु ही वीज महावितरण ग्राहकांकडून घेणार आहे. त्या बदल्यात ग्राहकाला वीज देयकात सवलत देणार असून, तसे धोरण शासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एका नाशिककर महिलेमुळे वीज नियामक आयोगाने या विषयाला चालना दिल्याने महाराष्ट्रात हा विषय मार्गी लागला आहे. राज्यात विविध शासकीय आणि खासगी वीज प्रकल्प साकारले जात आहे. तरीही विजेचा प्रश्न सुटलेला नाही. विजेचे भारनियमन शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोकेदुखी ठरते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पवन आणि सौर ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा घरगुतीस्तरावर वापर होऊ लागला आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या योगीता रवींद्र अमृतकर यांनी घरावर सौरऊर्जेचे पॅनल बसवून स्वत:च्या घरापुरती लागणारी वीज स्वत:च तयार केली आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकली तर असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हा प्रस्ताव सादर केला होता. नाशिकमधील चेतनानगरमधील आपल्या घराच्या छतावर त्यांनी २०० वॅट वीज निर्मितीचे सौरऊर्जा उपकरण बसवले; परंतु प्रत्यक्षात आपल्याला शंभर वॅट वीज लागत असल्याने अतिरिक्त वीज महावितरणने खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वीज नियामक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केली. सौर वीज ही पर्यावरण स्नेही-हरित वीज असल्याने राज्य शासनाची मागणी पूर्र्ण करू शकेल आणि त्यातून राज्यातील वीज भारनियमन कमी होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले होते आणि वीज नियामक आयोगाच्या इतिवृत्तात तशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार नियामक आयोगाने महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार आता धोरण जाहीर करण्यात आले आहे.सामान्य नागरिकांना, सोसायट्यांना सहकारी तत्त्वावर वीजनिर्मिती करण्याची आणि ती स्वत:साठी वापरतानाच शासनाला किंवा परवानाधारक वीज कंपनीला विकून आर्थिक लाभाची संधी देऊ केली आहे. छतावर तयार होणारी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण संबंधित ग्राहकाशी करार करणार असून त्या ग्राहकाकडे वीज कंपनीच्या वीज पुरवठ्याचे मीटर असेलच परंतु वीज घेण्यासाठीदेखील मीटर बसवले जाईल आणि ज्या मीटरमध्ये आयात विजेची नोंद ठेवली जाईल आणि जेवढी वीज आयात होईल तेवढीच ती ग्राहकाला पुरवलेल्या विजेच्या बिलातून वजा केली जाईल. म्हणजेच ग्राहकाने दिडशे युनिटचा वापर झाला असेल आणि ग्राहकाने महावितरणला आपल्या वापराव्यतिरिक्त ५० युनिट वीज पुरवली असेल तर ग्राहकाकडून दिडशे युनिट वीज आकारणीऐवजी शंभर युनिटसाठी आकारणी केली जाईल. त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून नागरिकांना स्वत:च्या घरगुती वीजबिलात बचत करता येऊ शकते. केंद्र शासनाने तर सौर उर्जेचा वापर करणाऱ्या आस्थापनांना अलीकडेच आयकरात सवलतही जाहीर केली आहे. मात्र, राज्यात शासनाने असा निर्णय घ्यावा यासाठी नाशिकमधीलच योगीता रवींद्र अमृतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. (प्रतिनिधी)