शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती सौरऊर्जा घेणार महावितरण

By admin | Updated: January 17, 2016 23:07 IST

नवे धोरण : नाशिकमधील महिलेच्या प्रयत्नांना यश; ग्राहकांना मिळणार लाभ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सौरऊर्जा हा एक उत्तम उपाय आहेच; परंतु ही वीज महावितरण ग्राहकांकडून घेणार आहे. त्या बदल्यात ग्राहकाला वीज देयकात सवलत देणार असून, तसे धोरण शासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एका नाशिककर महिलेमुळे वीज नियामक आयोगाने या विषयाला चालना दिल्याने महाराष्ट्रात हा विषय मार्गी लागला आहे. राज्यात विविध शासकीय आणि खासगी वीज प्रकल्प साकारले जात आहे. तरीही विजेचा प्रश्न सुटलेला नाही. विजेचे भारनियमन शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोकेदुखी ठरते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पवन आणि सौर ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा घरगुतीस्तरावर वापर होऊ लागला आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या योगीता रवींद्र अमृतकर यांनी घरावर सौरऊर्जेचे पॅनल बसवून स्वत:च्या घरापुरती लागणारी वीज स्वत:च तयार केली आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकली तर असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हा प्रस्ताव सादर केला होता. नाशिकमधील चेतनानगरमधील आपल्या घराच्या छतावर त्यांनी २०० वॅट वीज निर्मितीचे सौरऊर्जा उपकरण बसवले; परंतु प्रत्यक्षात आपल्याला शंभर वॅट वीज लागत असल्याने अतिरिक्त वीज महावितरणने खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वीज नियामक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केली. सौर वीज ही पर्यावरण स्नेही-हरित वीज असल्याने राज्य शासनाची मागणी पूर्र्ण करू शकेल आणि त्यातून राज्यातील वीज भारनियमन कमी होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले होते आणि वीज नियामक आयोगाच्या इतिवृत्तात तशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार नियामक आयोगाने महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार आता धोरण जाहीर करण्यात आले आहे.सामान्य नागरिकांना, सोसायट्यांना सहकारी तत्त्वावर वीजनिर्मिती करण्याची आणि ती स्वत:साठी वापरतानाच शासनाला किंवा परवानाधारक वीज कंपनीला विकून आर्थिक लाभाची संधी देऊ केली आहे. छतावर तयार होणारी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण संबंधित ग्राहकाशी करार करणार असून त्या ग्राहकाकडे वीज कंपनीच्या वीज पुरवठ्याचे मीटर असेलच परंतु वीज घेण्यासाठीदेखील मीटर बसवले जाईल आणि ज्या मीटरमध्ये आयात विजेची नोंद ठेवली जाईल आणि जेवढी वीज आयात होईल तेवढीच ती ग्राहकाला पुरवलेल्या विजेच्या बिलातून वजा केली जाईल. म्हणजेच ग्राहकाने दिडशे युनिटचा वापर झाला असेल आणि ग्राहकाने महावितरणला आपल्या वापराव्यतिरिक्त ५० युनिट वीज पुरवली असेल तर ग्राहकाकडून दिडशे युनिट वीज आकारणीऐवजी शंभर युनिटसाठी आकारणी केली जाईल. त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून नागरिकांना स्वत:च्या घरगुती वीजबिलात बचत करता येऊ शकते. केंद्र शासनाने तर सौर उर्जेचा वापर करणाऱ्या आस्थापनांना अलीकडेच आयकरात सवलतही जाहीर केली आहे. मात्र, राज्यात शासनाने असा निर्णय घ्यावा यासाठी नाशिकमधीलच योगीता रवींद्र अमृतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. (प्रतिनिधी)