शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घरगुती सौरऊर्जा घेणार महावितरण

By admin | Updated: January 17, 2016 23:07 IST

नवे धोरण : नाशिकमधील महिलेच्या प्रयत्नांना यश; ग्राहकांना मिळणार लाभ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सौरऊर्जा हा एक उत्तम उपाय आहेच; परंतु ही वीज महावितरण ग्राहकांकडून घेणार आहे. त्या बदल्यात ग्राहकाला वीज देयकात सवलत देणार असून, तसे धोरण शासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एका नाशिककर महिलेमुळे वीज नियामक आयोगाने या विषयाला चालना दिल्याने महाराष्ट्रात हा विषय मार्गी लागला आहे. राज्यात विविध शासकीय आणि खासगी वीज प्रकल्प साकारले जात आहे. तरीही विजेचा प्रश्न सुटलेला नाही. विजेचे भारनियमन शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोकेदुखी ठरते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पवन आणि सौर ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा घरगुतीस्तरावर वापर होऊ लागला आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या योगीता रवींद्र अमृतकर यांनी घरावर सौरऊर्जेचे पॅनल बसवून स्वत:च्या घरापुरती लागणारी वीज स्वत:च तयार केली आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकली तर असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हा प्रस्ताव सादर केला होता. नाशिकमधील चेतनानगरमधील आपल्या घराच्या छतावर त्यांनी २०० वॅट वीज निर्मितीचे सौरऊर्जा उपकरण बसवले; परंतु प्रत्यक्षात आपल्याला शंभर वॅट वीज लागत असल्याने अतिरिक्त वीज महावितरणने खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वीज नियामक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केली. सौर वीज ही पर्यावरण स्नेही-हरित वीज असल्याने राज्य शासनाची मागणी पूर्र्ण करू शकेल आणि त्यातून राज्यातील वीज भारनियमन कमी होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले होते आणि वीज नियामक आयोगाच्या इतिवृत्तात तशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार नियामक आयोगाने महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार आता धोरण जाहीर करण्यात आले आहे.सामान्य नागरिकांना, सोसायट्यांना सहकारी तत्त्वावर वीजनिर्मिती करण्याची आणि ती स्वत:साठी वापरतानाच शासनाला किंवा परवानाधारक वीज कंपनीला विकून आर्थिक लाभाची संधी देऊ केली आहे. छतावर तयार होणारी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण संबंधित ग्राहकाशी करार करणार असून त्या ग्राहकाकडे वीज कंपनीच्या वीज पुरवठ्याचे मीटर असेलच परंतु वीज घेण्यासाठीदेखील मीटर बसवले जाईल आणि ज्या मीटरमध्ये आयात विजेची नोंद ठेवली जाईल आणि जेवढी वीज आयात होईल तेवढीच ती ग्राहकाला पुरवलेल्या विजेच्या बिलातून वजा केली जाईल. म्हणजेच ग्राहकाने दिडशे युनिटचा वापर झाला असेल आणि ग्राहकाने महावितरणला आपल्या वापराव्यतिरिक्त ५० युनिट वीज पुरवली असेल तर ग्राहकाकडून दिडशे युनिट वीज आकारणीऐवजी शंभर युनिटसाठी आकारणी केली जाईल. त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून नागरिकांना स्वत:च्या घरगुती वीजबिलात बचत करता येऊ शकते. केंद्र शासनाने तर सौर उर्जेचा वापर करणाऱ्या आस्थापनांना अलीकडेच आयकरात सवलतही जाहीर केली आहे. मात्र, राज्यात शासनाने असा निर्णय घ्यावा यासाठी नाशिकमधीलच योगीता रवींद्र अमृतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. (प्रतिनिधी)