शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

घरगुती सौरऊर्जा घेणार महावितरण

By admin | Updated: January 17, 2016 23:07 IST

नवे धोरण : नाशिकमधील महिलेच्या प्रयत्नांना यश; ग्राहकांना मिळणार लाभ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सौरऊर्जा हा एक उत्तम उपाय आहेच; परंतु ही वीज महावितरण ग्राहकांकडून घेणार आहे. त्या बदल्यात ग्राहकाला वीज देयकात सवलत देणार असून, तसे धोरण शासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एका नाशिककर महिलेमुळे वीज नियामक आयोगाने या विषयाला चालना दिल्याने महाराष्ट्रात हा विषय मार्गी लागला आहे. राज्यात विविध शासकीय आणि खासगी वीज प्रकल्प साकारले जात आहे. तरीही विजेचा प्रश्न सुटलेला नाही. विजेचे भारनियमन शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोकेदुखी ठरते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पवन आणि सौर ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा घरगुतीस्तरावर वापर होऊ लागला आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या योगीता रवींद्र अमृतकर यांनी घरावर सौरऊर्जेचे पॅनल बसवून स्वत:च्या घरापुरती लागणारी वीज स्वत:च तयार केली आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकली तर असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हा प्रस्ताव सादर केला होता. नाशिकमधील चेतनानगरमधील आपल्या घराच्या छतावर त्यांनी २०० वॅट वीज निर्मितीचे सौरऊर्जा उपकरण बसवले; परंतु प्रत्यक्षात आपल्याला शंभर वॅट वीज लागत असल्याने अतिरिक्त वीज महावितरणने खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वीज नियामक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केली. सौर वीज ही पर्यावरण स्नेही-हरित वीज असल्याने राज्य शासनाची मागणी पूर्र्ण करू शकेल आणि त्यातून राज्यातील वीज भारनियमन कमी होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले होते आणि वीज नियामक आयोगाच्या इतिवृत्तात तशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार नियामक आयोगाने महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार आता धोरण जाहीर करण्यात आले आहे.सामान्य नागरिकांना, सोसायट्यांना सहकारी तत्त्वावर वीजनिर्मिती करण्याची आणि ती स्वत:साठी वापरतानाच शासनाला किंवा परवानाधारक वीज कंपनीला विकून आर्थिक लाभाची संधी देऊ केली आहे. छतावर तयार होणारी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण संबंधित ग्राहकाशी करार करणार असून त्या ग्राहकाकडे वीज कंपनीच्या वीज पुरवठ्याचे मीटर असेलच परंतु वीज घेण्यासाठीदेखील मीटर बसवले जाईल आणि ज्या मीटरमध्ये आयात विजेची नोंद ठेवली जाईल आणि जेवढी वीज आयात होईल तेवढीच ती ग्राहकाला पुरवलेल्या विजेच्या बिलातून वजा केली जाईल. म्हणजेच ग्राहकाने दिडशे युनिटचा वापर झाला असेल आणि ग्राहकाने महावितरणला आपल्या वापराव्यतिरिक्त ५० युनिट वीज पुरवली असेल तर ग्राहकाकडून दिडशे युनिट वीज आकारणीऐवजी शंभर युनिटसाठी आकारणी केली जाईल. त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून नागरिकांना स्वत:च्या घरगुती वीजबिलात बचत करता येऊ शकते. केंद्र शासनाने तर सौर उर्जेचा वापर करणाऱ्या आस्थापनांना अलीकडेच आयकरात सवलतही जाहीर केली आहे. मात्र, राज्यात शासनाने असा निर्णय घ्यावा यासाठी नाशिकमधीलच योगीता रवींद्र अमृतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. (प्रतिनिधी)